
आदिवासी महादेव कोळी समाज
7
Answer link
🎆महादेव कोळी 🎆
महादेव कोळी जमातीचा पहिला अभ्यासकCapton Mackintoshयाने असे नमूद केले आहे कि,महादेव कोळी हे महादेव टेकड्यांवरून खाली आले व त्यांनी‘घाट‘क्षेत्रेव्यापून टाकली. खुद्द या लोकांच्या म्हणण्यानुसार,महादेव कोळी जमातीचीपहिली वस्ती पुणे जिल्ह्यात उत्तरेकडील घाटमाथ्यावर कुकडी व घोडनदीच्याखो-यात एकवटली होती. तेथून पुढे ते आणखी उत्तरेला अहमदनगर व नाशिकजिल्ह्यांत पसरले. यालामहत्त्वाचा एक पुरावा असा कि,महादेव कोळीजमातीच्या कुलदेवतांची व गोत्रदेवतांची मूळठिकाणेकुकडी आणि घोडनदीच्या खो-यात व जुन्नर शेजारील परिसरात असून,या ठिकाणालामहादेव कोळी लोक आपले मूळ वसतीस्थान मानतात. महादेव कोळी जमातीच्यापूर्वेइतिहासानुसार ते १४ व्या शतकाच्या सुरुवातीला ठाणे जिल्ह्याच्याजव्हार,मोखाडा भागांत गेले. बहामनी राजाने यांच्यापैकी पोपेरा नावाच्याएका महादेव कोळ्याला इ.स.१३४६ मध्ये उत्तर कोकणातील जव्हार संस्थानाच्याप्रमुखपदी नेमले.पुणे जिल्ह्याच्या आग्नेयकडील खोरे व नाशिकजिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व वणीपर्यंतचे क्षेत्र अशा सुमारे २,५००चौ.मैलांच्या भूप्रदेशात महादेव कोळी जमातीची वस्ती आढळते. या विशिष्टप्रदेशाला‘कोळवन‘असेम्हणत असतं. हेच महादेव कोळी जमातीचे मूळ वसतीस्थानहोय. या भूप्रदेशात सह्याद्री पर्वतरांगांतील उंच गिरिशिखरे आढळून येतात.उदा. भीमाशंकर,हरिश्चंद्रगड,रतनगड,कळसुबाई,त्र्यंबकेश्वर. हि शिखरेमहादेव कोळी जमातीच्या देवतांची पवित्र ठिकाणे मानली जातात. ऐतिहासिकदप्तरात सर्व कोळी गटांची‘कोळी‘या एकाच सदराखाली नोंद झालेली आहे.वस्तुतः महादेव कोळी हे सामाजिक,सांस्कृतिक,व वांशिकदृष्ट्या वेगळे आहेत.यांच्यात व इतर कोळ्यांत बेटीव्यवहार होत नाहीत. त्यांची क्षेत्रेहीभौगोलिकदृष्ट्या अलग अलग आहेत. त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. त्यांची कुळे,गणगोत्र आणि सामाजिक रीतीरिवाजाच्या पद्धतीही भिन्न आहेत.
महादेव कोळी समाज हा सह्याद्रीच्या कुशीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतो. जव्हारलाही वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात महादेवकोळ्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो.महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा आणि एकवीरा देवी ही तर सर्वच कोळ्यांची दैवते आहेत. परंतु महादेव कोळ्यांची वरसुबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्टयपूर्ण आहेत. वाघदेव, मारुती,राम, शिव, कृष्ण इ. देव मानतात. दसरा, दिवाळी, अक्षय्यतृतीया वगैरे सण पाळतात. कमलजा देवीलाही पूजतात. कळसुबाई, जाकुबाई,सतुबाई, रानाई ऊर्फ रानबाई वगैरेही देवींना मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असतो. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात यात सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात हिरडा मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. मूल जन्माला आले, की त्याच्या अंगावर गार पाणी ओततात. त्याला ‘ओपसावणी’ म्हणतात. बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला साठीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकरी व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचेपाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून गृहदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवारअगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात.समाजात मृताला जाळतात किंवा पुरतात. लग्नअसगोत्र घराण्यांत होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात असे दिसते. उदा., बांबळे गोत्रीयांचे लग्न गोडे, हिले, झांजरे, नाडेकर आणि पिचड यांच्याशी होते.भारमल गोत्रीयांचे लग्न गभाले, पेढेकर यांच्याशीच होते.पूर्वी बालविवाह प्रचलित होता, परंतु अलीकडे सरासरी मुलाचे वय पंधरा-सोळा आणि मुलीचे त्याहून कमी असताना त्यांची लग्ने होतात. यात बदल होणे अपेक्षित आहे. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीचअसल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे देज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. ठाकूरांप्रमाणे महादेव कोळ्यांत लग्नाची गाणी गाणारी धवलारीण नसते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. समाजात बहुपत्नीत्व पध्दती रूढ आहे.काळाच्या ओघात यातील काही बाबी मागे पडत चालल्या आहेत. काहींना या आपल्या आदिवासीसंस्कृतीचा विसर पडला आहे. तरी आज आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे व ती जपण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.....
डॉ. गोविंद गारे व श्री. जी. एस.घुरे यांनी सखोल संशोधन करुन या समाजातील देवदेवता, रुढी परंपरा, चालीरिती पुस्तकाद्वारे आपल्या समोर आणल्या आहेत.
महादेव कोळी जमातीचा पहिला अभ्यासकCapton Mackintoshयाने असे नमूद केले आहे कि,महादेव कोळी हे महादेव टेकड्यांवरून खाली आले व त्यांनी‘घाट‘क्षेत्रेव्यापून टाकली. खुद्द या लोकांच्या म्हणण्यानुसार,महादेव कोळी जमातीचीपहिली वस्ती पुणे जिल्ह्यात उत्तरेकडील घाटमाथ्यावर कुकडी व घोडनदीच्याखो-यात एकवटली होती. तेथून पुढे ते आणखी उत्तरेला अहमदनगर व नाशिकजिल्ह्यांत पसरले. यालामहत्त्वाचा एक पुरावा असा कि,महादेव कोळीजमातीच्या कुलदेवतांची व गोत्रदेवतांची मूळठिकाणेकुकडी आणि घोडनदीच्या खो-यात व जुन्नर शेजारील परिसरात असून,या ठिकाणालामहादेव कोळी लोक आपले मूळ वसतीस्थान मानतात. महादेव कोळी जमातीच्यापूर्वेइतिहासानुसार ते १४ व्या शतकाच्या सुरुवातीला ठाणे जिल्ह्याच्याजव्हार,मोखाडा भागांत गेले. बहामनी राजाने यांच्यापैकी पोपेरा नावाच्याएका महादेव कोळ्याला इ.स.१३४६ मध्ये उत्तर कोकणातील जव्हार संस्थानाच्याप्रमुखपदी नेमले.पुणे जिल्ह्याच्या आग्नेयकडील खोरे व नाशिकजिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व वणीपर्यंतचे क्षेत्र अशा सुमारे २,५००चौ.मैलांच्या भूप्रदेशात महादेव कोळी जमातीची वस्ती आढळते. या विशिष्टप्रदेशाला‘कोळवन‘असेम्हणत असतं. हेच महादेव कोळी जमातीचे मूळ वसतीस्थानहोय. या भूप्रदेशात सह्याद्री पर्वतरांगांतील उंच गिरिशिखरे आढळून येतात.उदा. भीमाशंकर,हरिश्चंद्रगड,रतनगड,कळसुबाई,त्र्यंबकेश्वर. हि शिखरेमहादेव कोळी जमातीच्या देवतांची पवित्र ठिकाणे मानली जातात. ऐतिहासिकदप्तरात सर्व कोळी गटांची‘कोळी‘या एकाच सदराखाली नोंद झालेली आहे.वस्तुतः महादेव कोळी हे सामाजिक,सांस्कृतिक,व वांशिकदृष्ट्या वेगळे आहेत.यांच्यात व इतर कोळ्यांत बेटीव्यवहार होत नाहीत. त्यांची क्षेत्रेहीभौगोलिकदृष्ट्या अलग अलग आहेत. त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. त्यांची कुळे,गणगोत्र आणि सामाजिक रीतीरिवाजाच्या पद्धतीही भिन्न आहेत.
महादेव कोळी समाज हा सह्याद्रीच्या कुशीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतो. जव्हारलाही वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात महादेवकोळ्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो.महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा आणि एकवीरा देवी ही तर सर्वच कोळ्यांची दैवते आहेत. परंतु महादेव कोळ्यांची वरसुबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्टयपूर्ण आहेत. वाघदेव, मारुती,राम, शिव, कृष्ण इ. देव मानतात. दसरा, दिवाळी, अक्षय्यतृतीया वगैरे सण पाळतात. कमलजा देवीलाही पूजतात. कळसुबाई, जाकुबाई,सतुबाई, रानाई ऊर्फ रानबाई वगैरेही देवींना मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असतो. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात यात सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात हिरडा मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. मूल जन्माला आले, की त्याच्या अंगावर गार पाणी ओततात. त्याला ‘ओपसावणी’ म्हणतात. बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला साठीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकरी व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचेपाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून गृहदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवारअगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात.समाजात मृताला जाळतात किंवा पुरतात. लग्नअसगोत्र घराण्यांत होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात असे दिसते. उदा., बांबळे गोत्रीयांचे लग्न गोडे, हिले, झांजरे, नाडेकर आणि पिचड यांच्याशी होते.भारमल गोत्रीयांचे लग्न गभाले, पेढेकर यांच्याशीच होते.पूर्वी बालविवाह प्रचलित होता, परंतु अलीकडे सरासरी मुलाचे वय पंधरा-सोळा आणि मुलीचे त्याहून कमी असताना त्यांची लग्ने होतात. यात बदल होणे अपेक्षित आहे. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीचअसल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे देज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. ठाकूरांप्रमाणे महादेव कोळ्यांत लग्नाची गाणी गाणारी धवलारीण नसते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. समाजात बहुपत्नीत्व पध्दती रूढ आहे.काळाच्या ओघात यातील काही बाबी मागे पडत चालल्या आहेत. काहींना या आपल्या आदिवासीसंस्कृतीचा विसर पडला आहे. तरी आज आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे व ती जपण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.....
डॉ. गोविंद गारे व श्री. जी. एस.घुरे यांनी सखोल संशोधन करुन या समाजातील देवदेवता, रुढी परंपरा, चालीरिती पुस्तकाद्वारे आपल्या समोर आणल्या आहेत.