Topic icon

ऊर्जा स्रोत

0
कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा स्त्रोत कोणता?
उत्तर लिहिले · 26/10/2021
कर्म · 65
0

परिसंस्थेतील ऊर्जेचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे.

  • सूर्यप्रकाश: प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) प्रक्रियेद्वारे वनस्पती (Plants) सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. या अन्नाच्या माध्यमातून ऊर्जा परिसंस्थेतील इतर जीवांपर्यंत पोहोचते.

सूर्यप्रकाशामुळे परिसंस्थेतील जीवनाचे चक्र व्यवस्थित चालते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
0

ऊर्जा स्रोत म्हणजे मानवी व प्राणी जीवनास आवश्यक असणारी ऊर्जा उपलब्ध करून देणारे मार्ग. ऊर्जा स्त्रोतांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते:

1. पारंपरिक ऊर्जा स्रोत:

  • नैसर्गिक वायू: हा ऊर्जा स्रोत इंधनासाठी वापरला जातो.
  • कोळसा: औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये वीज निर्मितीसाठी याचा वापर होतो.
  • पेट्रोलियम: हे इंधन गाड्या व इतर वाहनांमध्ये वापरले जाते.
  • लाकुड: ग्रामीण भागात जळणासाठी वापरले जाते.

2. अपारंपरिक ऊर्जा स्रोत:

  • सौर ऊर्जा: या मध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून वीज तयार केली जाते.
  • पवन ऊर्जा: पवनचक्कीच्या साहाय्याने वीज तयार करणे.
  • जलविद्युत ऊर्जा: नदीच्या प्रवाहाचा वापर करून टर्बाइन फिरवून वीज तयार करणे.
  • बायोमास ऊर्जा: जैविक कचरा वापरून वीज निर्माण करणे.

3. नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत:

  • सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आणि बायोमास ऊर्जा हे नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत आहेत, कारण ते पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकतात.

4. अनूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत:

  • नैसर्गिक वायू, कोळसा आणि पेट्रोलियम हे अनूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत आहेत, कारण ते एकदा वापरले की ते पुन्हा तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो.

टीप: ऊर्जा स्त्रोतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते भविष्यात उपयोगी ठरतील.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
0
predicted.

पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत यांच्यातील महत्वाचे फरक खालीलप्रमाणे आहेत:

पारंपरिक ऊर्जा स्त्रोत (Conventional Energy Sources):

  • उपलब्धता: हे ऊर्जा स्त्रोत निसर्गात मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत.

  • नವೀनीकरण: हे ऊर्जा स्त्रोत एकदा वापरले की लवकर संपतात, ते लवकर नव्याने निर्माण होत नाहीत.

  • पर्यावरणावर परिणाम: या स्त्रोतांच्या वापरामुळे प्रदूषण होते, जसे की कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाढते.

  • उदाहरण: कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा.

  • खर्च: सुरुवातीला खर्च कमी असतो, पण दीर्घकाळात त्यांची उपलब्धता कमी झाल्याने खर्च वाढू शकतो.

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत (Non-Conventional Energy Sources):

  • उपलब्धता: हे ऊर्जा स्त्रोत निसर्गात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

  • नವೀनीकरण: हे ऊर्जा स्त्रोत वारंवार नव्याने निर्माण होऊ शकतात, त्यामुळे ते कधीही न संपणारे आहेत.

  • पर्यावरणावर परिणाम: या स्त्रोतांच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते किंवा होतच नाही, त्यामुळे ते पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत.

  • उदाहरण: सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा आणि बायोमास ऊर्जा.

  • खर्च: सुरुवातीला खर्च जास्त असतो, पण दीर्घकाळात ते स्वस्त ठरतात कारण त्यांची उपलब्धता भरपूर असते.

फरक:

पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादित आणि प्रदूषणकारी आहेत, तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे अमर्यादित आणि पर्यावरणपूरक आहेत.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440
2
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा...😃 पण पेट्रोल डिझेल का संपेल, संपणारच नाही.
उत्तर लिहिले · 6/11/2020
कर्म · 5145
2
ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता होय आणि ऊर्जा स्रोत म्हणजे कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवण्याचे केंद्र. जसे की आपल्याला माहिती आहे की ऊर्जा ही नव्याने निर्माण करता येत नाही किंवा ती नष्ट करता येत नाही ऊर्जा फक्त एका रुपांतून दुसऱ्या रूपात बदलता येऊ शकते.

ऊर्जेचा वापर हा काहीतरी उपयोगी कार्य करण्यासाठी होऊ शकतो जसे की उंचावर असलेल्या जलसाठ्यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली असते त्याला आपण स्थितीज ऊर्जा स्रोत असे म्हणु शकतो. जलसाठ्यातील पाणी हे उंचावरून खाली पडते त्यामुळे त्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते व त्यापासून टर्बाईन फिरवुन यांत्रिक ऊर्जा मिळते ह्या यांत्रिक ऊर्जे पासुन यांत्रिक कार्य घडते. टर्बाईनला जनित्रास जोडल्यामुळे जनित्रापासुन विदयुत ऊर्जा मिळते आणि ह्याला आपण विदयुत ऊर्जा स्रोत म्हणु शकतो. आणि ह्याचा विदयुत उर्जे पासुन आपण विविध विजेची उपकरणे चालवून कार्य घडवुन आणतो जसे वॉटर हीटर वापरून पाणी तापवणे, मोटर पंप वापरून पाणी उपसणे इत्यादी.

ऊर्जा स्रोत-

1)पवन ऊर्जा.

2)औष्णीक ऊर्जा.

3)सौर ऊर्जा.
उत्तर लिहिले · 4/4/2020
कर्म · 55350
3
                         *ऊर्जास्रोत*


कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवर होत असतो. पाणी, हवा, समुद्र, नद्या, वेगवेगळे जीव, तापमान, आर्द्रता, ऋतुमान, पर्जन्यमान, जमिनीचा कस, फळाफुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे सखोल विचार होऊ लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत कल्पकतेने विचार करू लागलो आहोत. सूर्यप्रकाश, एककेंद्रित सूर्यप्रकाश, वारा, जलप्रपात, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, किरणोत्सर्ग आणि अणू-रेणू, कॉर्न-८५, सेल्युलोसिक-ई-८५, अनेक प्रकारच्या विजेर्या, विशिष्ट प्रकारचे शेवाळे, ब्यूटेनॉल, जैविक इंधनांचे प्रकार, उसापासून बनविलेले इथेनॉल, हायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत. भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे भागविणार आहेत हे निश्‍चितच. अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे असणार आहे आणि ते विकसित करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे. मूलभूत विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा गाभा असतो, हे आज थोडे विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे.आज थोडे विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे.

ऊर्जेच्या निर्मितीसाठी आज वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यापैकी काही अत्यंत महत्त्वाच्या तंत्रांविषयी अगदी थोडक्‍यात विचार करू.

सोलर फोटोव्होल्टेइक्‍स (पीव्ही)
या विशिष्ट प्रकारच्या बॅटरीज निसर्गात मुबलक सापडणाऱ्या सिलिकॉन मूलद्रव्याच्या बनविल्या असतात. धन आणि ऋण प्रभारांच्या सिलिकॉनच्या पट्टीवर सूर्यप्रकाश पडला, ती त्या पट्टीमध्ये वीजनिर्मिती होते. ही वीज आपण इतरत्र वापरू शकतो. घरांच्या गच्चीवर, रस्त्यांच्या कडेला, बागांमध्ये किंवा ओसाड जमिनींवर अशा हजारो बॅटरीज लावून आपण सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करू शकतो. भारतासारख्या देशाला तर निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. आपल्याला मिळणाऱ्या मुबलक सूर्यप्रकाशाचे अशाप्रकारे सोने करून घेण्याची संधी आपण दवडता कामा नये. आज या तंत्रज्ञानात काही त्रुटी आहेत. ढगाळ, पावसाळी हवेत किंवा रात्री या बॅटरीज वीज निर्माण करू शकत नाहीत, तसेच त्यांचे तापमान ४५ अंशांपलीकडे गेले तर फार कमी वीजनिर्मिती होते. परदेशात शेतांमध्ये बसविलेले पीव्ही आज ६० मेगावॉटपर्यंत वीज निर्माण करीत आहेत. भविष्यात त्यांची क्षमता १५० मेगावॉट करण्याची योजना आहे. आपण या क्षेत्रात खूपच मागे आहोत.

अतितीव्र सौर ऊर्जा
या तंत्रामध्ये भल्यामोठ्या अंतर्वक्र आरशांच्या साह्याने सूर्यप्रकाश एकत्रित केला जातो. त्यामुळे त्याची तीव्रता शतपटींनी वाढते. हा अत्यंत "गरम' प्रकाश विशिष्ट अशा मोठ्या भांड्यांवर केंद्रित करतात. या भांड्यात पाणी, तेल किंवा मिठाचे द्रावण भरलेले असते. बाहेरील तीव्र उष्णतेने आतील द्रव प्रचंड तापतो आणि ती उष्णता वाफेचे इंजिन चालविते. त्यातून वीजनिर्मिती होते. आतील द्रव रात्रीसुद्धा गरम रहात असल्याने चोवीस तास कमी-अधिक प्रमाणात वीज तयार होते.



पवनचक्की

आजच्या अनेक संशोधकांच्या मते, पवनऊर्जा भविष्यातील ऊर्जेची गरज भागवू शकेल. वातावरणाचा ऱ्हास थांबवू शकेल आणि अत्यंत किफायतशीर दरात सर्वसामान्यांना वापरता येऊ शकेल. आज गिअर्सविरहीत टर्बाइन्स वापरली जात आहेत. विजेची निर्मिती वाऱ्याच्या वेगातील बदलाच्या तिसरा घात इतकी होते. म्हणजे वाऱ्याचा वेग दुप्पट झाला तर वीजनिर्मिती आठपट वाढते. वाऱ्याचा वेग जास्त मिळविण्यासाठी पवनचक्की अधिकाधिक उंचीवर बांधतात. पवनचक्कीचा आकारही मोठ्यात मोठा ठेवतात. नेदरलँड्स देशात २० टक्के ऊर्जा पवनचक्‍क्‍यांमुळे तयार होते. पवनचक्कीमुळे तयार झालेली वीज दूरवर शहरात नेण्यात आज अडचणी येत आहेत. त्यावर विचार होण्याची गरज आहे.

भूऔष्णिक

आईसलँडमधील भूऔष्णिक वीज उत्पादन केंद्र
पृथ्वीच्या पोटात, खोलवर वाफेचे आणि गरम पाण्याचे प्रचंड साठे आहेत. भूऔष्णिक तंत्रज्ञान या वाफेला आणि तप्त पाण्याला पृष्ठभागावर आणून त्यापासून वीजनिर्मिती करते. बऱ्याचदा भूगर्भातील वाफेचे तापमान १८० ते ३७० अंश असते. अशा ठिकाणी केशनलिका (बोअरवेल्स) खणून ते पाणी वर आणतात. त्यापासून वीजनिर्मिती झाली की दुसऱ्या केशनलिकेतून ते पुन्हा भूगर्भात सोडून देतात. या वाफेबरोबर अनेक वायू पृष्ठभागावर येतात. त्यांना वेगळे करून इतर कामांसाठी वापर करून घेता येईल. आज त्यांना वातावरणात सोडून दिले जाते. भूऔष्णिक उर्जेचा वापर ज्या भागात अशी वाफ उपलब्ध आहे अश्याच ठिकाणी करता येते. सध्या आइसलँड या देशात भूऔष्णिक उर्जेवर मोठ्या प्रमाणावर उर्जानिर्मिती करतात.


समुद्राच्या लाटा

सूर्य, चंद्र या दोहोंच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येते. एखाद्या ठरावीक ठिकाणचे तापमान पाणी त्यामुळे एका दिशेत सुमारे सहा तास वाहते आणि त्याविरुद्ध दिशेत पुन्हा सहा तास वाहते. समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीचा वापर करून टर्बाईन फिरवता येते; पण त्यासाठी लाटेचा वेग कमीत कमी दोन मीटर प्रतिसेकंद असावा लागतो. पवनचक्कीतून योग्य दरात वीजनिर्मिती करायची असेल तर वाऱ्याचा वेग सात मीटर प्रतिसेकंद आवश्‍यक असतो. आज स्थानिक भरती-ओहोटी खूपच अचूक सांगता येऊ लागल्यामुळे भविष्यात या तंत्राचा योग्य वापर करून वीजनिर्मिती सहज शक्‍य आहे.

कॉर्न आणि सेल्युलोसिक इथेनॉल

आजही खेडेगावात जैविक इंधन मोठ्या प्रमाणावर वापरतात. लाकूड, गाई-म्हशीचे शेण आणि गवत हे त्यांपैकी काही होत. इथेनॉल हे मका, ऊस, गहू अशा पदार्थांपासून कारखान्यात तयार करतात. आजच्या अनेक संशोधकांच्या मते इथेनॉलवर आधारित इंधन मानवाला, पशू-पक्ष्यांना आणि जमिनीच्या वापराला हानिकारक ठरते
उत्तर लिहिले · 8/3/2020
कर्म · 9415