Topic icon

पर्जन्यमान

0
2000 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमानाची राज्ये खालीलप्रमाणे:
  • कर्नाटक:

    कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात सरासरी पर्जन्यमान 3456 मि.मी. पेक्षा जास्त असते. KSNDMC

  • केरळ:

    केरळमध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमान 3000 मि.मी. पेक्षा जास्त असते. IMD

  • अरुणाचल प्रदेश:

    अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान 2000 मि.मी. पेक्षा जास्त नोंदवले जाते. UNIMELB

  • आसाम:

    आसाममध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2000 मि.मी. पेक्षा जास्त असते.

  • मेघालय:

    मेघालय हे भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले राज्य आहे. येथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 12,000 मि.मी. पेक्षा जास्त असते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1420
0
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो.

तर
सर्वात जास्त पाऊस कोकणातील सिंधुदुर्ग येथील आंबोली येथे होतो.
उत्तर लिहिले · 12/10/2022
कर्म · 7460
0

महाराष्ट्रामध्ये कमी पावसाचा जिल्हा सोलापूर आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्यमान 543 मि.मी. असते. हा जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने येथे पाऊस कमी पडतो.

इतर कमी पावसाचे जिल्हे:

  • अहमदनगर
  • पुणे
  • सातारा

संदर्भ:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1420
0

यवतमाळ जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1044.7 मि.मी. आहे.

(ref: yavatmal.gov.in)

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1420
2
आता पावसाचे दिवस आहेत, तोपर्यंत तो पडतच राहणार. बंद कधी होणार हे स्वतः हवामान खाते सुद्धा सांगू शकणार नाही. पावसाचा आनंद घ्या.
उत्तर लिहिले · 4/8/2019
कर्म · 1215
3
*पाऊस हा मिलीमीटर, सेंटीमीटर मध्ये कसा मोजला जातो?*


आपण खुपवेळा वाचलं किंवा पाहिलं असेल कि पाऊस हे लांबीमध्ये (मिलीमीटर,सेंटिमीटर किंवा इंच) मोजला जातो, त्यासाठी कुठलंही Calculation (गणना) केलं जात नाही. त्यामागे कारण असा कि, पावसाच्या थेंबाला ठराविक आकार किंवा वजन नसते.

*पर्जन्यमापन*

पर्जन्यमापनासाठी वापरणाऱ्या उपकरणाला Rainmeter (रेनमीटर) किंवा हाइड्रोमीटर, यूडोमीटर, प्लवीओमीटर या ओमब्रोमीटर म्हटला जातो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरण खालील खालीलप्रमाणे असते,

१) एक काचेची नळी किंवा कंटेनर ज्याला ‘Collecting Bottle’ म्हटलं जातो. ह्या नळीला  बाहेरून धातूचा मुलामा चढवलेला असतो. ह्या नळीमध्ये, पावसाचे जमाझालेले पाणी एकत्रित केला जातो.

२) काचेच्यानळीवर एक नरसाळा लावलेला असतो ज्यामुळे पाणी इकडे-तिकडे जात नाही.

३)  ह्या नळीला हलु नये म्हणून सिमेंटच्या आधाराने पावसात उघड्यावर ठेवला जातो. नळीला कुठल्याही झाडाखाली किंवा शेडखाली खाली ठेवला जात नाही कारण त्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने गोळा होत नाही.

४) रोज ठराविक वेळानंतर ह्या नळीमध्ये जमाझालेलं पावसाचे पाणी एका काचेच्या पात्रात (Beaker) जमा केला जातो. काचेच्या पात्राला मोजमापन करण्यासाठी मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा इंच मध्ये खुणा असतात (जसे पट्टीवर असतात तसे) आणि त्याद्वारे जमाझालेल्या पाण्याची उंची मोजली जाते.

५) आलेली उंची हि त्या ठिकाणाची त्या वेळेत झालेल्या पावसाची मापन असते.

६) ह्यात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची मापं (लांबी लांबी आणि रुंदी) जगात सगळ्याठिकाणी सारखीच ठेवली जाते. म्हणजेच नळीची लांबी २०३ मिलीमीटर आणि नरसाळ्याची व्यास ५ इंच ठेवली जाते.

७) आजकाल नळी आणि नरसाळा वेगळे वेगळे नसतात, ते एकत्रितपणे नळीवरच मोजमापीसाठी खुणा केलेल्या असतात.

८) भारतात हवामान विभागाद्वारे पावसाची दिवसातून २ वेळा (सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता) मोजमापन केला जातो.

९) आलेल्या निरीक्षणांची नोंद वर्षानुवर्षे ठेवली आणि केली जाते. त्याचा उपयोग त्या भागाचा सरासरी पर्जन्यवृष्टी किती झालं किंवा अंदाज किती होईल ह्याच भाकीत केला जातो.
उत्तर लिहिले · 17/8/2019
कर्म · 569245