
विमानतळ
0
Answer link
भारतातील काही महत्वाच्या विमानतळांची नावे खालीलप्रमाणे:
-
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.
-
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे.
-
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळूर
हे दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचे विमानतळ आहे.
-
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई
हे भारतातील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक आहे.
-
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता
हे पूर्व भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे.
-
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद
हे एक आधुनिक विमानतळ आहे आणि उत्तम सुविधांसाठी ओळखले जाते.
-
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोची
हे जगातील पहिले सौर ऊर्जा वापरणारे विमानतळ आहे.
या व्यतिरिक्त, भारतातील इतर महत्वाचे विमानतळ खालीलप्रमाणे:
- सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद
- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे
- गोव्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा
तुम्ही अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (Airports Authority of India) वेबसाइटला भेट देऊ शकता.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
0
Answer link
कोलकाता येथील विमानतळाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (Netaji Subhas Chandra Bose International Airport) आहे.
5
Answer link
भारतामधील विमानतळे हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत बनवले जातात व चालवले जातात. या संस्थेवर थेट सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट या सरकारी खात्याचे नियंत्रण असते. म्हणजेच भारतातील सर्व विमानतळ हे सरकारच्या मालकीचे असतात असे आपण म्हणू शकतो.
विमानतळावरील कर्मचारी हे कुठल्या विभागात काम करत आहे त्यानुसार ते कर्मचारी सरकारी असतात की नाही हे अवलंबून असते. जसे की सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान विमानतळांवर तैनात असतात ते सरकारी कर्मचारी असतात. मात्र सफाई कर्मचारी, मदतनीस किंवा दुकानावरील कामगार हे कंत्राटी पद्धतीने कामगार असतात ते सरकारी कर्मचारी नसतात.
2
Answer link
कस्टम अॅक्ट 1962 प्रमाणे भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ एक्ससाइझ अँड कस्टमस (सीबीईसी) अंतर्गत कस्टम ड्यूटी येते. यामुळे सरकारला आयात आणि निर्यात होणार्या मालावर ड्यूटी लागू करता येते, काही विशिष्ट माल आयात किंवा निर्यात होण्यापासून निषिद्ध करता येते, दंड वसूल करता येतो इत्यादी.
कस्टम ड्यूटी आकारणे, कस्टम ड्यूटी न दिल्यास करायची कार्यवाही, तस्करी थांबवणे आणि कस्टम संबंधी इतर प्रशासकीय निर्णय आणि धोरण निर्माण करण्याचे काम सीबीईसी यांचे असते.
भारतात कस्टम ड्यूटी ही विमानतळावर केली जाते
भारतात आयात होणार्या सर्व मालावर कस्टम ड्यूटी आकारली जाते. एक्सपोर्ट ड्यूटी आणि इम्पोर्ट ड्यूटी काही विशिष्ट मालावर आकारली जाते.🙏
कस्टम ड्यूटी आकारणे, कस्टम ड्यूटी न दिल्यास करायची कार्यवाही, तस्करी थांबवणे आणि कस्टम संबंधी इतर प्रशासकीय निर्णय आणि धोरण निर्माण करण्याचे काम सीबीईसी यांचे असते.
भारतात कस्टम ड्यूटी ही विमानतळावर केली जाते
भारतात आयात होणार्या सर्व मालावर कस्टम ड्यूटी आकारली जाते. एक्सपोर्ट ड्यूटी आणि इम्पोर्ट ड्यूटी काही विशिष्ट मालावर आकारली जाते.🙏
6
Answer link
जगातील सर्वांत मोठा विमानतळ नुकताच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. दुबई येथे रविवारी अल मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. बुडापेस्ट येथून सुमारे १०० प्रवाशांना घेऊन येणारे विमान रविवारी अल मक्टौम आंतरराष्ट्रीयविमानतळावर उतरले आणि प्रवाशांनी आश्चर्यचकित होऊन या विमानतळाची मुक्तकंठाने स्तुती केली.
संयुक्त अरब अमिराती या इस्लामिक देशाने बराच काळापासून स्वीकारलेली आधुनिकता आणि विकासाचे प्रतिबिंब त्या देशातील सरकारच्या नागरी उड्डाण क्षेत्रावरील धोरणात उठून दिसते. दुबई हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर सर्वाधिक उड्डाणे होणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र दुबई शहराबद्दलचे जगभरातील प्रवाशांचे वाढते आकर्षण आणि पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने एका अत्यंत सुंदर असा विमानतळ बांधणीचा प्रकल्प हाती घेतला आणि दुबई शहरात हा मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला. हा जगातील सर्वांत मोठा विमानतळ ठरला आहे. या विमानतळाच्या बांधणी आणि सुशोभिकरणासाठी सुमारे ३२ लक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आलेले आहेत. या विमानतळाचे काम अद्यापही सुरू आहे. या विमानतळावर पाच हवाई धापट्ट्या उभारण्यात येत आहेत. वर्षाकाठी या विमानतळावर १ अब्ज ६० लाख प्रवासी उड्डाण करू शकतील अशा पायाभूत सुविधा या विमानतळावर उभारण्यात येत आहेत. सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर हात मोकळे ठेवून खर्च करीत आहे. कारण पर्यटन आणि नागरी उड्डाण क्षेत्रांचे मोठे आर्थिक योगदान या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राहिलेले आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २८ टक्के वाटा एकट्या नागरी उड्डाण क्षेत्राकडून या देशाला प्रतिवर्षी मिळत असतो. यातील बहुतांश उत्पन्न दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून मिळत असते. मात्र दुबईचे विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यस्त असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असून सुविधांच्या बाबतीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. या विमानतळावरील भार आता मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बराच कमी होणार आहे. जगभरातील नागरिकांना पर्यटन आणि आपल्या संस्कृतीची, आदरातिथ्याची संधी उपलब्ध करून देण्या बरोबरच जागतिक स्तरावरील व्यावसायिक दारे उघडी करण्यासाठी आधुनिकीकरणाचा आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या अमिरातीचा हा एक चांगला प्रयत्न आहे, अशी माहिती दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल ग्रीफिथ्स यांनी दिली आहे.
संयुक्त अरब अमिराती या इस्लामिक देशाने बराच काळापासून स्वीकारलेली आधुनिकता आणि विकासाचे प्रतिबिंब त्या देशातील सरकारच्या नागरी उड्डाण क्षेत्रावरील धोरणात उठून दिसते. दुबई हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर सर्वाधिक उड्डाणे होणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र दुबई शहराबद्दलचे जगभरातील प्रवाशांचे वाढते आकर्षण आणि पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने एका अत्यंत सुंदर असा विमानतळ बांधणीचा प्रकल्प हाती घेतला आणि दुबई शहरात हा मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला. हा जगातील सर्वांत मोठा विमानतळ ठरला आहे. या विमानतळाच्या बांधणी आणि सुशोभिकरणासाठी सुमारे ३२ लक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आलेले आहेत. या विमानतळाचे काम अद्यापही सुरू आहे. या विमानतळावर पाच हवाई धापट्ट्या उभारण्यात येत आहेत. वर्षाकाठी या विमानतळावर १ अब्ज ६० लाख प्रवासी उड्डाण करू शकतील अशा पायाभूत सुविधा या विमानतळावर उभारण्यात येत आहेत. सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर हात मोकळे ठेवून खर्च करीत आहे. कारण पर्यटन आणि नागरी उड्डाण क्षेत्रांचे मोठे आर्थिक योगदान या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राहिलेले आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २८ टक्के वाटा एकट्या नागरी उड्डाण क्षेत्राकडून या देशाला प्रतिवर्षी मिळत असतो. यातील बहुतांश उत्पन्न दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून मिळत असते. मात्र दुबईचे विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यस्त असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असून सुविधांच्या बाबतीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. या विमानतळावरील भार आता मक्टौम आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बराच कमी होणार आहे. जगभरातील नागरिकांना पर्यटन आणि आपल्या संस्कृतीची, आदरातिथ्याची संधी उपलब्ध करून देण्या बरोबरच जागतिक स्तरावरील व्यावसायिक दारे उघडी करण्यासाठी आधुनिकीकरणाचा आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या अमिरातीचा हा एक चांगला प्रयत्न आहे, अशी माहिती दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल ग्रीफिथ्स यांनी दिली आहे.
2
Answer link
बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBI, आप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओडिशात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.