Topic icon

दहशतवाद

0
सध्या, "शेर आया" हा सांकेतिक शब्द काश्मीर हल्ल्यात वापरला गेला होता की नाही, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी स्थानिक पोलिसांचे गणवेश परिधान केले होते आणि त्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य केले, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. हल्लेखोरांनी काही जणांना 'कलमा' वाचायला सांगितला आणि जे असफल झाले त्यांना गोळ्या घातल्या, असेही काही वृत्तांमध्ये नमूद आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) नावाच्या एका संघटनेने स्वीकारली आहे, जे पाकिस्तानी समर्थित दहशतवादी संघटनांच्या सांगण्यावरून काम करते. अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर, मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईन.
उत्तर लिहिले · 24/4/2025
कर्म · 1440
0

समाजात भीती निर्माण करून राजकीय आणि वैचारिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या हेतूने चालवलेल्या हिंसाचाराला दहशतवाद म्हणतात.

दहशतवाद हा एक असाधारण आणि गंभीर गुन्हा आहे, जो समाजात अशांती आणि असुरक्षितता निर्माण करतो.

दहशतवादाचे मुख्य हेतू खालीलप्रमाणे असू शकतात:

  • राजकीय उद्दिष्ट्ये साध्य करणे.
  • एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करणे.
  • सरकारवर दबाव आणणे.
  • लोकांमध्ये भीती निर्माण करणे.

दहशतवादामुळे अनेक निरपराध लोकांचे जीव जातात आणि मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे, दहशतवादाचा समाजात तीव्र निषेध केला जातो.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
0
जगातील 10 महत्त्वाचे दहशतवादी हल्ले खालीलप्रमाणे:

जगातील 10 महत्त्वाचे दहशतवादी हल्ले:

  1. 11 सप्टेंबर 2001 चा हल्ला, अमेरिका:

    अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने coordinated attacks केले. त्यांनी प्रवासी विमानांचा वापर करून न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती आणि पेंटागॉनवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 3,000 लोक मारले गेले.

    संदर्भ: 911 Memorial & Museum

  2. 26/11 मुंबई हल्ला, भारत:

    26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला. त्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला ज्यात हॉटेल, रेल्वे स्टेशन आणि एक ज्यू सेंटर (Chabad House) यांचा समावेश होता. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले.

    संदर्भ: Encyclopædia Britannica

  3. मॅड्रिड ट्रेन बॉम्बिंग, स्पेन:

    11 मार्च 2004 रोजी, अल-कायदाने मॅड्रिडच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवले, ज्यात 193 लोकांचा मृत्यू झाला आणि 2,000 हून अधिक लोक जखमी झाले.

    संदर्भ: BBC News

  4. लंडन बॉम्बस्फोट, यूके:

    7 जुलै 2005 रोजी लंडनमध्ये दहशतवाद्यांनी भूमिगत रेल्वे आणि बसमध्ये बॉम्बस्फोट केले, ज्यात 52 लोकांचा मृत्यू झाला.

    संदर्भ: The Guardian

  5. Beslan school hostage crisis, रशिया:

    1 सप्टेंबर 2004 रोजी, चेचेन दहशतवाद्यांनी उत्तर ओसेशियातील एका शाळेत 1,100 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले. तीन दिवसांनंतर झालेल्या हिंसाचारात 330 हून अधिक लोक मारले गेले, ज्यात 186 मुले होती.

    संदर्भ: BBC News

  6. इराक मधील बॉम्बस्फोट :

    2007 मध्ये इराकमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले, ज्यात हजारो नागरिक मारले गेले. उदाहरणार्थ, 14 ऑगस्ट 2007 रोजी कैदी serial bombings मध्ये 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

    संदर्भ: Council on Foreign Relations

  7. नैरोबी दूतावास बॉम्बिंग, केनिया आणि टांझानिया:

    7 ऑगस्ट 1998 रोजी, अल-कायदाने केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासांवर बॉम्ब हल्ले केले, ज्यात 200 हून अधिक लोक मारले गेले.

    संदर्भ: GlobalSecurity.org

  8. बाली बॉम्बिंग, इंडोनेशिया:

    12 ऑक्टोबर 2002 रोजी, बालीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 202 लोक मारले गेले, ज्यात अनेक पर्यटक होते.

    संदर्भ: BBC News

  9. पॅरिस हल्ला, फ्रान्स:

    13 नोव्हेंबर 2015 रोजी, पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी coordinated attacks केले, ज्यात 130 लोकांचा मृत्यू झाला.

    संदर्भ: The New York Times

  10. पेशावर आर्मी स्कूल हल्ला, पाकिस्तान:

    16 डिसेंबर 2014 रोजी, तहरीक-ए-तालिबान या संघटनेने पेशावरमधील एका आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला केला, ज्यात 132 मुलांसह 141 लोकांचा मृत्यू झाला.

    संदर्भ: BBC News

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
0
१९९३ चा मुंबई बॉम्बस्फोटः
1. १२ मार्च १९९३ रोजी भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरामध्ये १३ विविध ठिकाणी स्फोट झाले. भारतीय भूमीवर होणाऱ्या या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुमारे २६० जण मरण पावले आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले.

2. याचा प्राथमिक परिणाम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीत दुपारी दीडच्या सुमारास झाला आणि त्यानंतर पुढील दोन तासात शहरातील अनेक भागात वाहन व दुचाकी स्फोटांची वाढ सामान्यपणे पसरू लागली.

२००१ मधील संसदेवरील हल्ला:

1. १ डिसेंबर २००१ रोजी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेएम) दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर ४५ मिनिटांचा सशस्त्र हल्ला केला आणि त्यामध्ये ९ पोलीस अधिकारी आणि संसदेतील कर्मचारी ठार झाले.

2. कमांडोंचा गणवेष परिधान केलेले अतिरेकी मंत्रालयाच्या स्टिकर्सना मदत करणाऱ्या वाहनांच्या मदतीने व्हीआयपी दरवाज्यातून संसदेमध्ये दाखल झाले.

3. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी गतिरोध सुरू झाला. अणूंनी सुसज्ज असणाऱ्या दोन्ही राष्ट्रांनी काश्मीरच्या भागात नियंत्रण रेषेवर लष्कराची अफाट उपाययोजना केली.



२००६ मधील मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट:

1. ११ जुलै रोजी, ११ मिनिटांमध्ये ७ बॉम्बस्फोट होऊन मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्ग हदरून गेला.

2. यामुळे २०९ व्यक्तींचे जीव गेले आणि ७०० हून अधिक लोक जखमी झाले. बॉम्ब वजनी-कुकरमध्ये बंद करून ठेवण्यात आले होते.

२००८ मधील मुंबईतील २६/११ हल्ला: 
1. २००८ मध्ये राष्ट्राच्या आर्थिक राजधानीला आणखी एका नियोजित हल्ल्याचा फटका बसला.

2. पाकिस्तानस्थित एलईटी दहशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी १२ ठिकाणी बेसुमर गोळीबार केला ज्यामुळे संपूर्ण शहर चार दिवस हदरले.

3. कोणत्याही घटनेत १७४ व्यक्ती मरण पावले आणि ३०० हून अधिक जखमी झाले.

• २०१६मधील उरी हल्ला:

1. २०१६ मध्ये चार सुसज्ज अशा दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी शहरातील भारतीय सैन्याच्या १२ ब्रिगेड बेस

कॅम्पवर हल्ला केला. 2. काश्मीरमधील वीस वर्षांतील सुरक्षा अधिकाऱ्यांवर झालेला हा सर्वात प्राणघातक हल्ला म्हणून ओळखला गेला, त्यावेळेस तेथे १८ सैनिकांची हत्या करण्यात आली होती.

3. हल्ला झाल्यानंतर जवळपास १० दिवसानंतर, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवरील (एलओसी) आव्हानात्मक अशा लाँचपॅडवर सावधपणे या हल्ल्याचे प्रतिउत्तर दिले.

• २०१९ मधील पुलवामा हल्ला:

1. सुरक्षा शक्तींवर झालेल्या सर्वात भयंकर दहशतवादी हल्ल्यांपैकी एक, या घटनेत सीपीआरएफच्या ४४ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि २० जणांना इजा झाली होती, तेव्हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील वाहनांच्या रक्षकाच्या दिशेने जेईएम च्या गटाने धोकादायक साधनांनी भरलेली एसयूव्ही नेली.

2. या हल्ल्यानंतर सुमारे १२ दिवसांनी, २६ फेब्रुवारीला पहाटेच्या वेळस, पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यातील बालाकोटमध्ये, जेएएम शिबिरावर आयएएफच्या विमानांनी हल्ला केला आणि त्अयामध्ये अनेक हल्लेखोरांचा बळी गेला.
उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 9415
0
जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या काही प्रमुख दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
  • लष्कर-ए-तैयबा (LeT): हा गट पाकिस्तानात स्थित आहे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे.
    • संस्थापक: हाफिज मुहम्मद सईद britannica.com
  • जैश-ए-मोहम्मद (JeM): हा गट देखील पाकिस्तानात स्थित आहे आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहे.
    • संस्थापक: मसूद अजहर satp.org
  • हिज्बुल मुजाहिदीन (HM): हा गट प्रामुख्याने काश्मिरी दहशतवाद्यांचा आहे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहे.
    • संस्थापक: मुहम्मद युसूफ शाह (सैयद सलाहुद्दीन) satp.org
  • अल-बद्र: हा गट देखील पाकिस्तानात स्थित असून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
0
जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे आणि त्यांच्या नेत्यांची नावे: * **लष्कर-ए-तैयबा (LeT):** हा गट प्रामुख्याने पाकिस्तानस्थित आहे आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. याचा म्होरक्या हाफिज सईद आहे. * **जैश-ए-मोहम्मद (JeM):** हा गट देखील पाकिस्तानस्थित आहे आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहे. मसूद अजहर हा या संघटनेचा नेता आहे. * **हिजबुल मुजाहिदीन (HM):** हा काश्मीरमधील सर्वात जुन्या दहशतवादी गटांपैकी एक आहे. सय्यद सलाहुद्दीन हा या संघटनेचा प्रमुख आहे. * **अल-बद्र:** हा गट 1990 च्या दशकात उदयास आला आणि काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होता. बखत जमन मेंगल या संघटनेचा नेता आहे. * **हरकत-उल-मुजाहिदीन (HuM):** हा गट देखील पाकिस्तानस्थित असून काश्मीरमध्ये सक्रिय आहे. फजल उर रहमान खलील या संघटनेचा नेता आहे.
उत्तर लिहिले · 29/8/2022
कर्म · 0
1

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला
हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण आणि धक्कादायक हल्ला होता.

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.[१][२][३] मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.[४][५]


मुंबईतील या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला.
दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.[६]

पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.[७] भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला.[८] परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.[९]

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.

हल्ल्याची ठिकाणे संपादन करा
हल्ल्याची ठिकाणे[१०]
ठिकाण हल्ल्याचा प्रकार
छत्रपती शिवाजी टर्मिनस गोळीबार
लियोपोल्ड कॅफे, कुलाबा गोळीबार
ताज महाल हॉटेल गोळीबार, ६ बॉम्बस्फोट, आग, ओलिस[५]
ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल गोळीबार, बॉम्बस्फोट
मादाम कामा इस्पितळ गोळीबार, ओलिस
नरीमन हाउस गोळीबार, ओलिस
मेट्रो सिनेमा गोळीबार
माझगांव डॉक बॉम्बस्फोट
विले पार्ले बॉम्बस्फोट
घटनाक्रम संपादन करा

कुलाब्यात पोलिस बंदोबस्त.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोटरसायकली.
गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरुन समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरुन सोडण्यात आल्या होत्या.[११]

बातमी अहवालांनुसार नोव्हेंबर २६ रोजी रात्री ८:१० वाजता एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले.[१२] स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले.[१२] ८:२० वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणार्‍या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.[१३]

नोव्हेंबर २६ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. ४७ असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले.[१४] यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या.[१५] याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह १५ जणांना ओलिस घेतले.[१६] रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलिस मुख्याधिकार्‍यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताज होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे,[५] पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच.[१७] इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी ४० ओलिस धरले.[१८] यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती.[१९][२०] २८ला पहाटे ४:२२ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली.[५] यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारुन इमारतीचा ताबा घेतला.<[१६]

या वेळी दोन्ही होटेलना आगी लागलेल्या होत्या व लश्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता.[२१] सुमारे ४०० लश्करी कमांडो आणि ३०० एन.एस.जी. कमांडो तसेच ३५-१०० मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते.[१५] या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.

भारतात प्रवेश 
  तारीख अंदाजे वेळ
(भारतीय) घटना
नोव्हें २१ संध्याकाळ कराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले[२२][२३]
नोव्हें २२ विनाशसामुग्रीचे वाटप. प्रत्येकाला ३० गोळ्या असलेली ६-७ मॅगेझिन देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला ४०० गोळ्या, ८ हातबॉम्ब, एक ए.के. ४७ असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला[२२]
नोव्हें २२ इतर काही दहशतवादी ताजमहाल होटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेउन राहण्यास दाखल झाले.[२२]
नोव्हें २३ पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील ४ कोळ्यांना ठार मारुन कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडले.[२२]
नोव्हें २४ कुबेरच्या कप्तानाला ठार मारुन दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी दोन तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले.[२२]
नोव्हें २६ दुपार, संध्याकाळ दहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडे निघाले.[२२]
नोव्हें २६ रात्र पाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.[२२]
नोव्हें २६ रात्री उशीरा या दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाउसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले.[२२]
ताज हॉटेल संपादन करा
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस मधील गोळीबाराचे निशाण
 
ओबेरॉय ट्रायडेंट होटेल
स्रोत: एन.डी.टी.व्ही.[२४], इव्हनिंग स्टँडर्ड[२५], आणि बी.बी.सी.[२६]

  तारीख अंदाजे वेळ
(भारतीय) घटना
नोव्हें २६ २३:०० दहशतवादी ताजमहाल हॉटेलात घुसले.[२४]
नोव्हें २७ मध्यरात्र मुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला.[२४]
नोव्हें २७ ०१:०० हॉटेलाच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट. इमारतीत आग.[२४]
नोव्हें २७ ०२:३० दोन ट्रकमधून सैनिक दाखल. दर्शनी भागातील लॉबीवर कबजा. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग[२४]
नोव्हें २७ ०३:०० अग्निशमन दल आले. लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार.[२४]
नोव्हें २७ ०४:०० अग्निशमन दलाने शिड्या वापरून २००+ व्यक्तींना सोडवले.[२४]
नोव्हें २७ ०४:३० दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी.[२४]
नोव्हें २७ ०५:०० बाँबपथक आणि कमांडो दाखल. पोलिसांनी मारा वाढवला.[२४]
नोव्हें २७ ०५:३० आग आटोक्यात. दहशतवाद्यांनी १००-१५० ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले.[२४]
नोव्हें २७ ०६:३० सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज.[२४]
नोव्हें २७ ०८:०० काही व्यक्तींची लॉबीतून सुटका.[२४]
नोव्हें २७ ०८:३० चेंबर्स क्लबमधून अजून ५० व्यक्तींची सुटका.[२४]
नोव्हें २७ ०९:०० गोळीबार सुरुच. अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी.[२४]
नोव्हें २७ १०:३० इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी.
नोव्हें २७ मध्याह्न अजून ५० व्यक्तींची सुटका.
नोव्हें २७ १६:३० दहशतवाद्यांनी चौथ्या मजल्यावर आग लावली.
नोव्हें २७ १९:२० अजून एन.एस.जी. कमांडो घटनास्थळी दाखल, होटेल वर नवीन हल्ला.
नोव्हें २७ २३:०० मोहीम चालूच.
नोव्हें २८ ०२:५३ सहा मृतदेह मिळाले.
नोव्हें २८ ०२:५३ – ०३:५९ दहा हातबॉम्बचा स्फोट
नोव्हें २८ १५:०० मरीन कमांडोनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली.
नोव्हें २८ १६:०० आरमारी कमांडोंना सुमारे १५ अधिक मृतदेह मिळाले.
नोव्हें २८ १९:३० इमारतीत नवीन झटापटी व स्फोट.
नोव्हें २८ २०:३० एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी.
नोव्हें २९ ०३:४०– ०४:१० पाच अजून स्फोट झाल्याची बातमी.
नोव्हें २९ ०५:०५ आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ.
नोव्हें २९ ०७:३० पहिल्या मजल्यावरील आग चालूच, दुसऱ्या मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमकी सुरुच.
नोव्हें २९ ०८:०० कमांडोंनी ताजमहाल होटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्याखोल्यांतून शोधमोहीम सुरू. जनतेचा रस्त्यांवर जल्लोष.[२७]
ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल संपादन करा
ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल येथील घटनाक्रम असा घडला.

 
ओबेरॉय ट्रायडेंट होटेलचा अंतर्भाग
  तारीख अंदाजे वेळ
(भारतीय) घटना
नोव्हें २७ ६ वा एन.एस.जी चे पथक हॉटेलापाशी दाखल.
नोव्हें २७ ८:४० वा गोळीबाराचा आवाज, सेना व नौदलाच्या पथकाचे आगमन.
नोव्हें २७ १३:३० वा दोन लहान ग्रेनेडचे स्फोट. इमारतीत अजून कुमक घुसली.
नोव्हें २७ १५:२५ वा काही विदेशी नागरिकांची सुटका.
नोव्हें २७ १७:३५ वा शीख रेजिमेंटीचे आगमन, प्रचंड गोळीबार.
नोव्हें २७ १८:०० वा एर इंडियाच्या इमारतीतून ओलिसांची सुटका काही विदेशी नागरिकांची रुग्णालयात रवानगी.
नोव्हें २७ १८:४५ वा स्फोटाचा आवाज दोन कंमांडो व २५ सैनिक जखमी झाल्याचा अंदाज. अजून काही ओलिसांची सुटका एकूण ३१.
नोव्हें २७ १९:१० वा एका अतिरेक्याला कंठस्नान.
नोव्हें २७ १९:२५ वा हॉटेलाच्या ४थ्या मजल्यावर आग
नोव्हें २७ २३:०० वा ऑपरेशन चालू
नोव्हें २८ १० वा ट्रायडंटमधून काही ओलिसांची सुटका.
नोव्हें २७ १५:00 PM कंमांडो ऑपरेशन संपले २४ ओलिस नागरिक मृत, २ दहशतवादी ठार[२८] एकूण १४३ ओलिसांची सुटका.[२९]
नरीमान हाउस संपादन करा
नरीमान हाउस येथील घटनाक्रम असा घडला.

 
नरीमन हाउस
  तारीख अंदाजे वेळ
(भारतीय) घटना
नोव्हें २७ ७.०० वा पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला.
नोव्हें २७ ११.०० वा पोलिस व अतिरेक्यांच्यात गोळीबार, एक अतिरेकी जखमी.
नोव्हें २७ १४:४५ वा अतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबाँम्ब फेकला, हानी नाही.
नोव्हें २७ १७:३० वा एन.एस.जी चे कंमांडोंचे आगमन, नौदलीय हेलीकॉप्टरने सर्वेक्षण.
नोव्हें २७ २३.०० वा ऑपरेशन चालू.
नोव्हें २८ ००:०० वा पहिल्या मजल्यावरुन ९ ओलिसांची सुटका.
नोव्हें २८ ७:३० वा एन्.एस्.जी कंमाडोंनी नरीमन हाउसच्या गच्चीवर हेलीकॉप्टरने प्रवेश.[३०]
नोव्हें २८ ३.०० वा एन्.एस्.जी कंमाडों आणि अतिरेकी यांच्यातील गोळीबार चालूच.
नोव्हें २८ रात्री ७:३० वा ज्यू धर्मगुरू, त्यांची पत्नी व इतर तिघे असे ५ जणांची अतिरेक्यांकडून हत्या.
नोव्हें २८ रात्री ८:३० वा एन.एस.जी कंमाडोंचे २ अतिरेक्यांना कंठस्नान, एन्.एस्.जी कंमाडों यांची मोहीम समाप्त. तशी सरकार कडून अधिकृत घोषणा.


उत्तर लिहिले · 26/11/2021
कर्म · 121765