Topic icon

हवामान अंदाज

0

अनेक प्रकारच्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते, ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी कमी करता येते. काही प्रमुख आपत्ती आणि त्यांच्या पूर्वसूचनेची माहिती खालीलप्रमाणे आहे:

1. हवामानाशी संबंधित आपत्ती (Weather-related disasters):

  • पूर (Flood): पूर येण्याची शक्यता असल्यास, हवामान विभाग सतत माहिती देत असतो. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास पूर्वसूचना मिळते. यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधी मिळते. महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन योजना
  • चक्रीवादळ (Cyclone): चक्रीवादळाची पूर्वसूचना उपग्रहांमार्फत (satellites) मिळते. त्याची दिशा आणि तीव्रता यांचा अंदाज असल्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येते. भारतीय हवामान विभाग, नवी दिल्ली
  • त्सुनामी (Tsunami): समुद्रात भूकंप झाल्यास त्सुनामी येण्याची शक्यता असते. भूकंपाच्या केंद्रस्थानावरून आणि वेळेवरून त्सुनामीची पूर्वसूचना मिळू शकते.
  • ढगफुटी (Cloudburst): विशिष्ट ठिकाणी अचानक जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी होऊ शकते. याची पूर्वसूचना मिळवणे कठीण असले तरी, रडारच्या मदतीने काही प्रमाणात अंदाज लावता येतो.
  • शीत लहर (Cold Wave): हवामानातील बदलांमुळे अचानक तापमान घटल्यास शीत लहर येऊ शकते. याची पूर्वसूचना हवामान विभाग देतो.

2. भूगर्भीय आपत्ती (Geological disasters):

  • भूकंप (Earthquake): भूकंपाची पूर्वसूचना देणे सध्या तरी पूर्णपणे शक्य नाही, तरी काही ठिकाणी भूकंपाच्या संभाव्य क्षेत्रांचा अभ्यास करून अंदाज व्यक्त केला जातो.
  • ज्वालामुखी (Volcano): ज्वालामुखीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाते. त्यामुळे उद्रेक होण्याची शक्यता असल्यास पूर्वसूचना मिळू शकते.
  • भूस्खलन (Landslide): अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात भूस्खलन होऊ शकते. भूस्खलनprone क्षेत्रांची पाहणी करून पूर्वसूचना देता येते.

3. इतर आपत्ती (Other disasters):

  • वणवा (Forest Fire): उन्हाळ्यामध्ये जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते. तापमान वाढल्यास आणि वाऱ्याची दिशा बघून वणव्याची शक्यता वर्तवता येते.
  • औद्योगिक अपघात (Industrial Accidents): कारखान्यांमध्ये विषारी वायू गळती किंवा स्फोट झाल्यास पूर्वसूचना प्रणालीमुळे (Early Warning System) धोक्याची सूचना मिळू शकते.

याव्यतिरिक्त, तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नवनवीन पद्धती विकसित होत आहेत, ज्यामुळे आपत्तींची पूर्वसूचना अधिक अचूकपणे मिळू शकेल.

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 1440
0

सर्वात चांगले हवामान संकेतस्थळ निवडणे हे तुमच्या गरजांवर आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. तरीही, काही लोकप्रिय आणि अचूक हवामान संकेतस्थळे खालीलप्रमाणे आहेत:

  • AccuWeather: हे संकेतस्थळ विस्तृत अंदाज, रडार नकाशे आणि गंभीर हवामानाची सूचना देते. AccuWeather
  • The Weather Channel: हे एक लोकप्रिय संकेतस्थळ आहे जे अचूक अंदाज आणि हवामानाचे सविस्तर विश्लेषण देते. The Weather Channel
  • National Weather Service: हे अमेरिकेचे सरकारी संकेतस्थळ आहे आणि सार्वजनिक वापरासाठी विनामूल्य हवामानाची माहिती देते. National Weather Service
  • Ventusky: हे संकेतस्थळ इंटरऍक्टिव्ह नकाशावर हवामानाची माहिती दर्शवते आणि ते वापरण्यास अतिशय सोपे आहे. Ventusky

या संकेतस्थळांव्यतिरिक्त, अनेक हवामान ॲप्स (apps) देखील उपलब्ध आहेत, जे तुमच्या स्मार्टफोनवर हवामानाची माहिती देतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
1
*पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत*

- मारुती चितमपल्ली

*1. चातक पक्षी -*

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

*2. पावशा पक्षी -*

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

*3. तित्तीर पक्षी -*

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

*4. कावळा -*

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

*5. वादळी पक्षी -*

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

*6. मासे -*

पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

*7. खेकडे  -*

तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

*8. हरीण -*

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.

*9. वाघिण -*

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

*10. वाळवी -*

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

*11. काळ्या मुंग्यां -*

हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

*मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.*

*खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.*

*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.*

*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.*

*आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.*
उत्तर लिहिले · 13/5/2020
कर्म · 1425
0
Playstore वर हवामानाचे खूप सारे ॲप आहेत, तुम्ही सर्च करून जास्त रेटिंग पाहून डाउनलोड करू शकता. त्यात हवामानाचे daily update होते.
उत्तर लिहिले · 6/10/2018
कर्म · 1345
2
तुमच्या location प्रमाणे तुम्हाला अंदाजाचे नोटिफिकेशन येईल. पुढील पावलांनी जा,
Google app
       |
Click on Right hands three bar
       |
Setting
       |
Notification
       |
Your feed
       |
Wheather
उत्तर लिहिले · 12/9/2018
कर्म · 3860
9
वेधशाळेचे अंदाज हे काही थोड्या निरीक्षणातून केलेले असतात. उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला कि वारे वाहू लागतात आणि ढग पुढे सरकतात आणि पाऊस पडतो.  वारंवार हे घडत असल्यास  या निरीक्षणानुसार जेव्हा अशी स्थिती निर्माण होईल तेव्हा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जातो आणि बऱ्याच वेळा तो खरा ठरतो. हे मी फक्त एक उदाहरण सांगितले आहे. थोडक्यात मानवाने निरीक्षणाद्वारे जरी काही गोष्टी शिकून निसर्गाचा अंदाज सांगण्याचे कौशल्य थोडे फार आत्मसात केले आहे, तरी माणूस निसर्गाच्या पुढे अजून गेलेला नाही आणि जाऊ सुद्धा शकत नाही. 
आता अलीकडील काळात वेधशाळेचे बरेच अंदाज चुकायला लागलेत.  यावर काल मी एक बातमी सुद्धा वाचली जिथे एका राजकीय पक्षाने नेहमी चुकीचा अंदाज देणाऱ्या वेधशाळा बंद करा अशी मागणी केली आहे. पण इथे आपण हे समजून घेतले पाहिजे कि हे अंदाज काही निरीक्षणानुसार तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार वर्तवले जातात. आणि अंदाज चुकतात याचा अर्थ निसर्ग जसा वागणे अपेक्षित आहे तसे होत नाही. याचे कारण म्हणजे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. निसर्गाचा जो ह्रास होत चालला आहे त्यानुसार निसर्ग मानवाचे अंदाज नक्कीच चुकवणार हे निश्चित आहे. मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग हीच सर्वोच्च शक्ती आहे. आणि निसर्गाने हे बऱ्याच वेळा त्सुनामी, भूकंप अश्या आपत्तीतून दाखवून दिले आहे. पण तरी मानव शहाणा होत नाही.
असेच चालू राहल्यास वेधशाळेचे अंदाज तर चुकणारच.
उत्तर लिहिले · 15/7/2017
कर्म · 48240