Topic icon

यात्रा

0

होय, जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून (Belgaum) लोक पायी आणि बैलगाडी करून येतात.

  • पायी: अनेक भाविक बेळगावहून जोतीबा डोंगरला पायी चालत येतात.
  • बैलगाडी: काही लोक पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून प्रवास करतात.

हे मुख्यतः श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहे.

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 1180
0

यात्रा वर्णनाचे भेद:

यात्रा वर्णनामध्ये अनेक भेद असू शकतात, जे खालीलप्रमाणे आहेत:

  1. स्थळानुसार भेद:
    • ऐतिहासिक स्थळांचे वर्णन
    • नैसर्गिक स्थळांचे वर्णन (जसे की डोंगर, समुद्र, वने)
    • शहरी भागांचे वर्णन
    • ग्रामीण भागांचे वर्णन
  2. उद्देशानुसार भेद:
    • धार्मिक यात्रा (तीर्थयात्रा)
    • शैक्षणिक यात्रा
    • मनोरंजनपर यात्रा
    • व्यावसायिक यात्रा
  3. शैलीनुसार भेद:
    • व्यक्तिनिष्ठ (Subjective): यात लेखक आपल्या भावना आणि अनुभव व्यक्त करतो.
    • वस्तुनिष्ठ (Objective): यात स्थळांची आणि घटनांची factual माहिती दिली जाते.
    • हास्यपूर्ण शैली
    • गंभीर शैली
  4. काळानुसार भेद:
    • भूतकाळातील घटनांचे वर्णन
    • वर्तमानातील अनुभवांचे वर्णन
    • भविष्यातील योजनांचे वर्णन
  5. प्रवास माध्यमानुसार भेद:
    • रेल्वे प्रवास
    • विमान प्रवास
    • समुद्र प्रवास
    • बस किंवा कारने प्रवास
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1180
1
यात्रा करणार आहात तर यात्रा सफल होण्यासाठी शुभेच्छा
यात्रेसाठी स्वतः च वाहन घेऊन जाणार आहात ते ठिक आहे .  टोल  मात्र भरपूर आहेत  पुण्याला जाण्यासाठी 16/17तास लागतील. गुजरात मध्ये सौराष्ट्र गुजरात लागेल तिथे सौराष्ट्र फाॅरेस्ट आहे ते जंगल फिरण्यासाठी एक तास लागतो.ते फिरण्यासाठी तिथे तिखट आहे आणि त्यांच्याच वाहणाने जावं लागतं
आणि नंतर पुढे सोरटी सोमनाथ तिथे गेल्यावर तुम्हाला देवदर्शन. करायचे असेल तर तुम्हाला तिथे राहावं लागेल.तिथे रूम घ्यावे लागेल.तिथे धर्मशाळा ही आहेत हाॅटेल आहेत तिथे रूम मिळतील जेवणाची सोय हाॅटेल मध्ये किंवा मंदिरांच्या ट्रस्ट तर्फे जेवणाची सोय असते जेवणाची वेळ 11ते 1वाजेपर्यत आणि संध्याकाळी 6ते7वाजे पर्यंत.मंदिरात दर्शनासाठी जाताना आपल्या कडे असलेले पैशाचं पाकीट आणि मोबाईल तिथे कांऊटर असतात तिथे जमा करावे लागते ते आपल्याला टोकन नंबर दिला जातो दर्शन घेऊन झाल्यावर आपला टोकन नंबर देऊन आपलं सामान घ्यावे
सोमनाथच दर्शन झाल्यावर नागेश्वराच दर्शन करावे 
तुम्हाला देवदर्शन करायचे असेल तर तुमचं वाहण न नेता तिथे रिक्षावाले असतात ते आपल्याला सर्व देवदर्शन करून देतात आणि आणि आपल्या रूमवर आणून सोडतात सोमनाथ ला एक रात्र राहिल्या वर आपलं स्वतः च वाहण घेऊन दुसऱ्या दिवशी द्वारका द्वारकाधीश ,रणछोड हे दर्शन करून तुम्हाला गिरणारीला जायचे असेल तर तुम्हाला सोमनाथ जशी पध्दत आहे तसेच तुम्हाला तिथे रूम घेऊन राहावं लागेल जेवणाची वेळ हि सोमनाथला आहे तसेच आहे  स्वतः चे वाहण घेऊन गिरणारीला जावे मग तिथे गेल्यावर तिथे विसाव्या साठी रुम घ्यावी तिथे आपलं सामान ठेवावे मग तिथे जाण्यासाठी वयस्कर वृद्धांसाठी चांगली सुविधा आहे त्यांना सहज रित्या दर्शन घेऊ शकतात गिरणार रोपवे. आहे त्याची तिकिट आहे त्आपल्याला दर्शन घेण्यासाठी डोंगर चढून पार करून जावे लागते. मंदिरात जाण्यासाठी 10,000पायऱ्या आहेत.

गिरनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालतात. गिरनारच्या भोवती घनदाट जंगल आहे. या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आज्ञा शिवाय अनुमती मिळत नाही. फक्त परिक्रमेच्या कालावधीत येथे 5 दिवसांसाठी भाविकांना प्रवेश देण्यात येते.
 आपली यात्रा सफल होवो ही सदिच्छा
ओम नमः शिवाय 🙏🙏

उत्तर लिहिले · 16/2/2023
कर्म · 53710
0
गरु. गणिते
उत्तर लिहिले · 25/1/2024
कर्म · 0
1
♍ *घुंगरु वाजल्यानंतर पडतो पाऊस !* ♍माहिती सेवा गृप पेठवड़गाव 13-July-2016 :
जवळा (अहमदनगर), दि. 13 - पावसासाठी अनेक ठिकाणी होमहवन केले जातात. होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़ पण जामखेड तालुक्यातील जवळा येथे नर्तिकांच्या पायातील घुंगरांचा आवाज झाला की हमखास पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे़ म्हणूनच गावात आषाढी एकादशीला नर्तिका पायात घुंगरु चढवतात़
जामखेड तालुक्यातील जवळा येथे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि़१५) रथयात्रेस प्रारंभ होत आहे. जवळेश्वर यात्रेमध्ये नृत्यांगना मोठ्या प्रमाणात नृत्य करण्यासाठी येतात. गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या नर्तिकांच्या पायातील घुंगरु वाजल्यानंतर पाऊस पडतो, अशी आख्यायिका आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़ मात्र, जवळा येथे अद्याप पाऊस नाही़ दरवर्षी आषाढी एकादशीनंतर जवळा येथे मोठा पाऊस होतो़ आषाढी एकादशीनिमित्त गावात आलेल्या नर्तिकांच्या घुंगरांच्या आवाजामुळेच पाऊस पडतो, अशी येथील पिढीजात धारणा आहे़ त्यामुळे या यात्रेला मोठे महत्व असते़♍
ही रथयात्रा १९ जुलैपर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध एकादशी ते गुरुपौर्णिमा असे ५ दिवस चालते.
*https://m.facebook.com/story.php?story_fbid=200821746982423&id=100011637976439*
आषाढी एकादशीच्या दिवशी जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वराची आरती करून रथयात्रेस प्रारंभ होतो. गावातील एकूण १० मंडळांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रात्रभर चालतो. नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळा पंचक्रोशीतील हजारो लोक येतात. पहिल्या दिवशी सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरात येऊन जवळेश्वराची आरती करतात. यात्रेमध्ये विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते. शेवटच्या दिवशी म्हणजे ५ व्या दिवशी जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. दुपारी जवळेश्वराची आरती करून मुख्य रस्त्याने मिरवणूक निघते. रथासमोर नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. रथास मोठमोठे दोर लावून ओढले जाते. रथ ओढण्यास ५० ते ६० लोक लागतात. रथाला नारळाचे तोरण अर्पण करतात. जवळजवळ ३०,४० हजार नारळांचे तोरण रथात असते.
*१०० वर्षांचा रथ*
राज्यातील सर्वांत मोठा साधारण १०० वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला येदू सुरवसे या सुताराने तो तयार केला आहे. त्यामुळे रथात बसण्याचा मान सुरवसे परिवाराला आहे. अजून रथाची कसलीही मोडतोड झालेली नाही. दरवर्षी रथास तेल लावून मगच त्यात मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते.♍
8
तिरूमाला येथे असलेल्या व्यंकटेश्वरच्या प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरातील ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. इतिहासात पहिल्यांदाच भगवान व्यंकटेश्वरचे हे मंदिर 6 दिवसांकरता बंद राहणार आहे.

हा निर्णय महासंप्रोक्षण अनुष्ठान करण्याकरता घेतला आहे. हा निर्णय तब्बल 12 वर्षानंतर घेण्यात आला आहे. या अनुष्ठानादरम्यान फक्त पुजारीच मंदिरात प्रवेश करून शकतात. यावेळी ते मंदिरातील साफसफाई आणि डागडुजीचे काम करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 17 ऑगस्टच्या सकाळी 6 पर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे. मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला.
उत्तर लिहिले · 20/7/2018
कर्म · 123540
15
जगातील सर्वात मोठा सोहळा म्हणून पंढरपूरच्या वारीकडे पाहिले जाते. या वारीची नोंद गिनीज बुकातसुद्धा झाली आहे. देहू व आळंदी येथून या पालख्या पंढरपूर दर्शनासाठी मार्गस्थ होतात. खालील इमेजमध्ये पालखीचा मार्ग दिलेला आहे.
उत्तर लिहिले · 9/7/2018
कर्म · 310