Topic icon

मैत्री

0

संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण या विषयावर एक निबंध खालीलप्रमाणे आहे:

संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण

सध्याच्या जगात, संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन गोष्टी एकमेकांशी विरोधात असल्यासारख्या वाटतात. संपत्तीचे प्रदर्शन म्हणजे गुंतवणुकीतील वाढ, तर निसर्गाचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचा संरक्षण करणे. या दोन गोष्टी एकमेकांशी विरोधात असल्याचे दिसून येते कारण संपत्तीचे प्रदर्शन वाढवण्यासाठी अनेकदा पर्यावरणावर परिणाम करणारे व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली जाते.

परंतु, संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेणे शक्य आहे. यासाठी, गुंतवणूकदारांनी निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला पाहिजे. निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे पर्यावरणावर कमी परिणाम करतात आणि पर्यावरण संवर्धनात योगदान देतात.

ग्राहक संरक्षण हा या संदर्भात एक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांनी निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे, निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांना आर्थिक पाठिंबा मिळेल आणि ते आपले पर्यावरणीय धोरण सुरू ठेवू शकतील.

संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण यासाठी काही विशिष्ट उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत:

गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक धोरणात निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांचा समावेश करावा.
ग्राहकांनी निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये खरेदी करावी.
सरकारने निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांसाठी प्रोत्साहनात्मक धोरणे राबवावीत.
या उपाययोजनांमुळे, संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेणे शक्य होईल.

या विषयावर काही अतिरिक्त विचार खालीलप्रमाणे आहेत:

संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी, गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.
निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्याने, गुंतवणूकदारांना पर्यावरणीय लाभांसह आर्थिक लाभ देखील मिळू शकतात.
सरकारने निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी, पर्यावरणीय अहवालीकरण आणि पारदर्शकता यासारखी धोरणे राबवली पाहिजेत.
एकंदरीत, संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर जागरूकता वाढवून आणि उपाययोजनांवर काम करून, आपण संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेऊ शकतो.

उत्तर लिहिले · 28/9/2023
कर्म · 34115
1
मैत्री म्हणजे काय 
मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.


मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते.

मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा .२ म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड ,  अध्यात्मिक मैत्री  पाळिव प्राणी, मित्र, वगैरे.

इतिहासातील मैत्री :-

तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय

बिरबल आणि अकबर



व्यक्तिगत मित्राची लक्षणे

ज्याच्या जवळ

. मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही
. पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही
. ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात
.ज्याच्याविषयी आपल्या मनात कधीच वाईट विचार येत नाही


*मैत्रीची कविता*
मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!
काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....!
उत्तर लिहिले · 31/7/2023
कर्म · 48335
0


 मैत्री श्रेष्ठ की कर्तव्य कि नातं. - 


मैत्री म्हटलं की सुदामा कृष्णा चे मैत्रीचं नात्याला तोड नाही.मित्र सर्वानाच असतात . परंतु शेवटपर्यंत टिकून असतात ते बालमित्र .वाढत्या वयानुसार स्थल काल परत्वे मैत्रीचे नाते वृध्दिंगत होत असते.जिथे वैचारिक साम्य असते. सहवास एकमेकांच्या भेटीगाठी शिवाय चैनच पडत नाही. जिवनाच्या प्रवासात अनेक मित्र भेटले. जिवाला जिव लावणारे सख्खे भाऊ सुध्दा मित्र असु शकतात. जेव्हा विवाह होतो आणि दोघेही स्वतंत्ररीत्या अलिप्त होतात.तेव्हा याच भाऊबंदकी असलेल्या मैत्री च्या नात्यात दुरावा निर्माण होतो. एकमेकांना जपणारे भाऊ एकमेकांच्या अंगावर उठतात. ते केवळ संपत्ती साठी किंवा हिस्से वाटणी साठी. नातं किंवा मैत्री असं होत असते का ? एवढं कसं अंतर विचारात निर्माण होतो. मुलगा वडील हे सूध्दा मित्र असू शकतात. या नात्यात मी दुरावा बघीतलं आहे. दुरावा मतभिन्नता जलन स्पर्धा ज्या नात्यात नाही . असं नातं म्हणजे मैत्री . पण असं नातं शंभरात एखादंच .आई मुलगा. भाऊ बहिण. वडील मुलगा. मुलगी वडील. जावई सासरे .अशा रक्ताच्या नात्यात बरेचदा मैत्री असते. मैत्री जेवढी दृढ तेवढंच नाते दृढ. मग ते रक्ताचे असो की रक्ता बाहेरचे. प्रश्न असा निर्माण होतो की पारदर्शकता अधिक कोणत्या नात्यात असते. म्हणतात ना मैत्री पिंपळाच्या पानासारखी असावी जितकी जिर्ण तेवढीच पारदर्शकता. आणि हे सत्य आहे.वेळ प्रसंगानुसार जिवाला जिव लावणारे. सुख दुःखात सहभागी होणारे सर्वच नात्यात कुठे ना कुठे मैत्री भावना असते. पण मैत्री एवढ्यावरच थांबत नाही. या नात्यात कुठेतरी अहंभाव महत्त्व मी पणा ज्याला आपण क्रेडिट म्हणतोय ते घेणारे आलेच. प्रत्येक जणच ज्याच्या घरी ते खाऊन घेऊन प्रत्येकच जण आप आपल्या ठिकाणी सुखी असतो. मोह माया मी पणा हटवादी प्रवृत्ती मी म्हणतो तेच खरे. माझ्यामुळेच झालं चांगले पार पडलं आटोपले या सर्व गोष्टी मेत्रीत नात्यात होत असतात का ? अगदी जवळचे मित्र सुध्दा आपला मित्र आपल्या पेक्षा जास्त गुणवत्ता प्राप्त करतो का .आपल्या समोर जातो का . असं श्रेष्ठ होणे समोर जाणं प्रसिद्धी मिळणे. या सर्व बाबी मैत्रीत खटकतं असतात. माणसाचा तो स्थायी भावच आहे आपल्या स्वता पैक्षा समोर गेलेले प्रगती केलेली डोळ्यात सहन होत नाही. पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ ताटा खालच मांजर बणून असावे. हीच भावना असते. मग वेगवेगळे डावपेच करणं. काहीतरी भिन्न परीस्थिती निर्माण करणे. कमजोर करण्याचं प्रयत्न करणे. छुपे डावपेच करणं. समोर चांगले मागे काहीतरी वेगळेच खेळ चालले असतात. कुरघोडी करणे. यामुळे मैत्रीतील विश्र्वासाहर्ता संपवितात आणि तसेच तो मी नव्हेच ची भुमिका घेणे.मैत्रीतील शुध्दता सुंदरता संपवितात .जे सुंदर आहे ते स्वच्छ आहे. जे स्वच्छ आहे ते शुद्ध आहे. आणि जे शुध्द आहे ते पारदर्शक असते. जसं पाण्यात चेहरा शुध्द दिसतो . काच हे पारदर्शक आहे. आकाश निरभ्र आहे. हवेच अस्तीत्व जाणवतं पण दिसत नाही. तसंच नातं मैत्रीचं असायला हवं. अपवाद वगळता निरपेक्ष पारदर्शकता भाव फारच कमी. अगदी शुन्य. बरेच लोक शुन्याला किंमत नाही . असे म्हणतात. तोच शुन्य एक च्या उजवीकडे बसला तर एकचे मुल्य दहा होते. पुढे हाच क्रम चालू असला तर ते अनंता पलीकडे वाढते.असच मेत्रीत व्हायला पाहिजे. असंच व्हायला पाहिजे. पण असं फार कमी प्रमाणात होत असते. ज्याला अंत नाही असं पारदर्शक नातं म्हणजे मैत्री. एक एक मित्र सोबत असल की ते अनंता पलीकडे जाते . परंतु तो भाव जपता आलं पाहिजे. एकदा काय झालं दोघेही गावातच राहणारे.दोघे मित्र एक डाक्टर तर दुसरा शिक्षक दोघेही बालमित्र. शिक्षक मित्राची प्रकृती बिघडली. त्याची पत्नी घाबरली . ती डाक्टर मित्राकडे गेली. यांची प्रकृती फार गंभीर आहे.कृपया बघता का घरी आहेत चलता का.. डाक्टर मित्राने नकार दिला. तिच्या डोळ्यात अश्रु आले. ती नाराज झाली. मित्रा विषयीच प्रेम संपुष्टात आले. शिक्षकांनी डाक्टरची बाजू घेत पत्नीला समजावीले. अगं तो व्यस्त असेल. पेशंट असतील . वेळ नसेल. म्हणत प्रसंग सावरलं ती म्हणाली तुमचा तो मित्र डाक्टर म्हणून नाही. परंतु मित्र म्हणून आलं असतं . पण साधा एक फोन किंवा चौकशी करू शकत होतं. हे चुकीचे नाही का . मग कसला मित्र कसलं नातं. शिक्षक मित्र अनूत्तरीत झालं. पतीला म्हणाली या ठिकाणी तुमच्या ऐवजी त्यांची प्रकृती बिघडली असती तर तुम्ही प्रथमता निरोप मिळता क्षणी धाव घेतले असते. असो काही प्रसंग मैत्रीच्या नात्याला संशयित करतात. म्हणूनच म्हणतात मैत्री ही पिंपळाच्या पानासारखी असावी जितकी जिर्ण तेवढीच पारदर्शकता असावी .तोच दुसरा प्रसंग नदीच्या पाण्यात डोहात बुडणार्या माणसाला किनार्या वरून पाहा पाहा म्हणणारे अनेक असतात. परंतु स्वताच जिव धोक्यात टाकून जिव वाचविणारा अनोळखी मित्र एकादाच असतो.त्याला जिवन दान देतो. दोन्ही प्रसंगात व्यक्ती एकच मित्र भिन्न. कोणता मित्र श्रेष्ठ ? कोणता भाव पारदर्शकता दाखविते. असे अनेक उदाहरणे सांगता येतील. दोघेही पती पत्नी असणारे डाक्टर दांपत्य आपल्याच जिव्हाळ्याच्या नात्यातील माणसाच्या प्रसंगानुरूप उपयोगी पडत नसेल तर त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच काय उपयोग. शिक्षक असेल आणि कुटुंबातील मुलांना घडविण्यात सहकार्य होत नसेल तर त्याचा परीवाराला काय उपयोग . परंतु मेत्रीत नात्यात हा भाव असतो का . शिक्षणासाठी शहरात राहून हाटेल चेडब्बे खाणारे अनेक मुलं असतात. त्यांना मैत्रीतील किंवा नात्यातील लोक किती जवळ करतात. कुठे आहे पारदर्शकता. नांत कोणतेही असो निरपेक्ष भाव निरपेक्ष पारदर्शकता असायलाच पाहिजे.जपायलाच पाहिजे . म्हणूनच मैत्री पिंपळाच्या पानासारखी........ . सर्व सुखी भवन्तु सर्व सुखी निरामय.
उत्तर लिहिले · 24/12/2022
कर्म · 48335
1

जीवनाचे एक दुसरे नाव…मैत्री

म्हणून आपल्या आयुष्यात एक तरी मित्र असावा च असं वाटतं. भावापेक्षाही मित्र जवळचा वाटू लागतो. आपल्याला अशी मैत्रीची खूप सवय लागून रहाते. मित्र गावाला थोड्या दिवसांसाठी गेला तरी करमत नाही. असं कोणतं नातं असतं ? मैत्रीमधे…

सीमा मंगरूळे तवटे. वडूज
मैत्रीला नसते कधी
वयाचे बंधन
असे निरागस
मैत्रीचे कोंदण…

आयुष्यातील जगण्याचा मार्ग
सुखदुःख वाटून घेणार असतं एक ठिकाण

मैत्रीची अनेक रुपे , प्रत्येक वयातील होणारी मैत्री आणि या मैत्रीच एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींचेही जे मित्र, मैत्रिणी असतात. त्याही आपल्या मित्र मैत्रिणी होत जातात. म्हणजेच मैत्रीची ही साखळी न तुटणारी असते आणि ती वाढतच जाणारी असते.

जेष्ठ नागरिकांची मैत्री अलीकडे खूप प्रमाणात वाढताना दिसत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कारण निवृत्त झाले की, लोकांचा वेळ घरी अजिबात जात नसे आणि एका जागी रहाण्याने आणि विचार शक्ती खुंटल्यामुळे हे जेष्ठ नागरिक विविध आजाराला बळी पडायचे त्यामुळे कधी कधी अंथरुणावर खिळून तरी रहायचे तर कधी स्वर्गाची वाट धरायचे.

पण अलीकडे समाज झपाट्याने बदलू लागलाय मोबाईलमुळे जग जवळ येत चाललय. त्यात व्हाॅट्सपमुळे तर आणखी जग जवळ आलंय आणि याच माध्यमांचा उपयोग करुन जेष्ठ नागरिकांनी आपलाही छान मैत्री ग्रुप बनवलाय. मग तेही आपल्या ग्रुपमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात. सहल, ट्रेकिंग, योगा क्लास आणि त्यांच्या आवडीच्या उपक्रमामधे भाग घेऊन जीवनाचा आनंद लुटतात. आणि आपला वेळही छान आपल्या आवडीनिवडी नुसार घालवतात. भजन, किर्तनाचा आनंद ही घेतात.

मैत्री असते निर्झर झऱ्यासारखी खळाळत वहाणारी
संकटात हात धरणारी
मी आहे ना म्हणणारी
आयुष्य जगत असताना माणसाला अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागते अशा वेळेस काही वेळा मनातल्या गोष्टी घरातील व्यक्ती जवळ बोलता येत नाही. मग व्यक्ती कधी कधी मानसिक नैराश्यामध्ये सुद्धा जाऊ शकते. अशा वेळी मैत्री तिथे धावून जाते. मग आपल्या मनातील व्यथा, वेदना आपल्या मित्र मैत्रिणी जवळ मोकळ्या होतात. आणि मग मोठं ओझं डोक्यावरून खाली उतरल्यासारख वाटत. हलक वाटत.

म्हणून आपल्या आयुष्यात एक तरी मित्र असावा च असं वाटतं. भावापेक्षाही मित्र जवळचा वाटू लागतो. आपल्याला अशी मैत्रीची खूप सवय लागून रहाते. मित्र गावाला थोड्या दिवसांसाठी गेला तरी करमत नाही. असं कोणतं नातं असतं ? मैत्रीमधे…

मैत्रीमधे नातं असतं प्रेमाच, आपुलकीच आणि महत्वाचे म्हणजे काळजीच.
महत्त्वाचे म्हणजे मैत्रीत कधीही गर्व, इर्षा नसते. आपला मित्र पुढे चाललाय तो साहेब झालाय हे एक मित्रच आपल्या मित्रांबद्दल अभिमानाने बोलू शकतो.

किती सांगावं मैत्रीबद्दल…अहो, आपण अडचणीत असलो तर आपण आपल्या पाहुण्यांपेक्षा जवळच्या मित्राला पहिला फोन लावतो आणि तोही अडचणीतून काही ना काही मार्ग काढून देतो. आणि अभिमानाने म्हणतो ही अशी असावी मैत्री

मैत्री कोणत्याही वयात आणि कोणाशीही होऊ शकते. फक्त विचार जुळले की झाली मैत्री. पण मैत्री करताना आणि निभावताही आली पाहिजे. फक्त स्वार्थ साधण्यासाठी किंवा कामापुरती मैत्री नका करू, तर ती आयुष्यभर अखंड राहावी. यासाठी दोघांकडूनही प्रयत्न झाले पाहिजेत.

असावी एक मैत्रीण
उमलणाऱ्या फुलासारखी
सुकून गेल्या पाकळ्या तरी
मैत्रीचा सुगंध कायम ठेवणारी

म्हणून मैत्रीला जागा, मैत्रीची कधीही फसवणूक करू नका. मैत्री प्रत्येकाच्या जीवनातील एक अमृत आहे. ते पिल्याने माणूस आयुष्यभर ताजा टवटवीत राहू शकतो….


उत्तर लिहिले · 12/12/2022
कर्म · 48335
8
मैत्री असावी कृष्ण सुदामा सारखी, मैत्री असावी दुर्योधन कर्ण सारखी, मैत्री असावी श्रीराम सुग्रीव सारखी, मैत्री असावी.

यांच्या मैत्री मध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता.

मित्र असा असावा जो सुखदुःखात कामी पडेल, जो दुर असून सुद्धा तुम्हाला विसरणार नाही, जो तुमचा सन्मान करेल, जो तुमच्याशी कुठलाही छळ करणार नाही असा मित्र असावा, अशे चांगले मित्र फारच कमी मिळतात. काही मित्र त्यांचं काम झाल्यावर नंतर ते तुमच्या कामी पडत नाही, अहंकार गर्व आल्यावर तुम्हाला विसरून जातात, तुमचा अपमान सुद्धा करतात. महाभारतात आचार्य द्रोण आणि द्रुपद यांचं उदाहरण तुमच्या समोर आहे.
उत्तर लिहिले · 2/9/2022
कर्म · 44170