Topic icon

प्रेम

0
 राजाचे 'कलेवर' प्रेम होते.



येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे.

आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.

आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे.. उदा., आता पाऊस पडत आहे. 'पाऊस पडणे' या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.

१. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली..

२. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या 'मॉर्निंग वॉक'च्या बेतावर पाणी पडले.

अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...' असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.
उत्तर लिहिले · 6/8/2023
कर्म · 48335
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2



लहान वयात प्रेमात पडलाय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

प्रेम होण्याला कोणते वय नसते. ते अगदी सहज होऊन जाते. पण जर कमी वयात प्रेमात पडलात तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हे सांगण्यामागचं कारण फक्त हेच आहे की प्रेम होणं जरी आपल्या हातात नसलं तरी प्रेमातील मर्यादा सांभाळून ते टिकवणं नक्कीच आपल्या हातात असतं. अशावेळी बेजाबाबदारपणे एखादी केलेली चूकही महागात पडू शकते.






जगात अशी कितीतरी जोडपी आहेत जी कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हा प्रेमाचा प्रवास लग्न करुन पूर्णत्वास नेतात. एकमेकांसोबतचा हा प्रवास नक्कीच त्यांच्यासाठी संस्मरणीय असतो. पण मित्रमैत्रीणींनो प्रत्येक वेळीच लहान वयात झालेलं प्रेम त्याच्या ध्येयापर्यंत पोहचताना सहजासहजी मार्ग काढेल असं नाही. तर कधी कधी हेच प्रेम आपल्या आयुष्यात संकटांचा डोंगर बनून देखील येऊ शकतो. प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हदयाने निर्णय घेतात. ज्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो. असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मंडळी त्या काही नाजूक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं

हल्लीची बरीच मुलं-मुली कॉलेजमधील आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या प्रेमात पडतात. येथून सुरु झालेली प्रेमकहाणी ही अनेक साहसांनी भरलेली आणि भावनिक बंधात बांधली गेलेली असते. त्यामुळे अशा परिस्थितीत बरेचजण अभ्यासापेक्षा प्रेमाला आणि नात्याला जास्त महत्व देऊ लागतात. यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि त्याचा परिणाम रिझल्टवर देखील पडू शकतो. त्यामुळे करियर डोळ्यांपुढे ठेवून जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा. कारण जे नातं मुळत: मजबूत आहे ते कधीच तुटणार नाही.






पैसे खर्च करणे

प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देणे, प्रियकराला खुश करण्यासाठी सरप्राईज देणे आणि फिरायला जाण्यासारख्या गोष्टी या जोडप्यांमध्ये अगदी साधारण आहेत. पण यात जो सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पैसा! या सर्व गोष्टींसाठी पैशांची गरज भासते आणि कॉलेजमधील मुलांकडे पैसे नसल्याने पैशांसाठी ते सहाजिकच आई-वडीलांवर अवलंबून राहतात. आई-वडीलांनी पैसे न दिल्यास ते मित्रांकडून उधारी घेतात आणि जेव्हा ही रक्कम चुकती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र संकटाचा डोंगरच या जोडप्यांवर कोसळतो. त्यामुळे खर्च तितकाच करा जितका आपल्या क्षमतेत बसतो. अन्यथा पैशांवर चालणारे नाते जास्त काळ टिकत नाही.





शारीरिक जवळीक

ही गोष्ट फारच संवेदनशील आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांसाठी शारिरिक जवळीक फारच सामान्य गोष्ट आहे. पण कॉलेजमध्ये जाणा-या मुलांनी असं करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देण्यासारखं आहे. कारण थोडाा निष्काळजीपणा केल्याने मुलींना गर्भवती राहण्याचा धोका आणि एसटीडी सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे भविष्य देखील धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही लग्नाच्या वयास पात्र होत नाही किंवा त्या वेळेपर्यंत नातं घेऊन जात नाही तोपर्यंत शारीरिक जवळीकीपासून दूर राहिलेलंच उत्तम!



गैरफायदा घेणं
कॉलेजमध्ये अशी बरीच मुलं-मुली असतात जी स्वत:च्या आनंदासाठी, आरामदायी जीवनासाठी प्रेमप्रकरण सुरु करतात. त्यामुळे अशा नात्यांमध्ये प्रेम नसतं आणि कॉलेज संपताच ही नाती देखील तुटतात. अशावेळी सर्वात जास्त त्रास त्या व्यक्तीला होतो जो खरोखर मनापासून त्या नात्यात गुंफलेला असतो. अशा परिस्थितीत ब-याचदा ब्लेकमेल आणि शारीरिक अत्याचारासारख्या गोष्टी देखील घडतात आणि पोलिसांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे प्रेमात पडताना नक्की कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात पडताय ते नक्की एकदा पडताळून घ्या.



भूतकाळ
आकर्षण वाटलं म्हणून प्रेमात पडू नका. प्रेमात पडण्याआधी त्या मुला-मुलीबद्दल सर्व माहिती जाणून घ्या. कधी कधी नातं सुरु करण्यासाठी खोटी माहिती समोर ठेवली जाते म्हणून तिचा सुरुवातीलाच पडताळा करणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीच्या भूतकाळाची आणि तो कोणत्या मित्रमंडळींमध्ये वावरतो याचीही चौकशी करायला हवी. कारण ब-याचदा आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्यांचा प्रभाव आपल्यावर प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे नात्याचा पाया हा मजबूत करण्यासाठी सर्व बाजूंनी ते सुरक्षित आहे का हे पाहणं आपली स्वत:ची जबाबदारी असते.


उत्तर लिहिले · 8/2/2023
कर्म · 48335