भूगोल
जिल्हा
इतिहास
महाराष्ट्र: महाराष्ट्रातील विभागवार जिल्हे व त्या जिल्ह्यांची नावे कशी पडली? कशी देण्यात आली? महत्त्व?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र: महाराष्ट्रातील विभागवार जिल्हे व त्या जिल्ह्यांची नावे कशी पडली? कशी देण्यात आली? महत्त्व?
9
Answer link
*🌷जाणून घेऊया महाराष्ट्रातील विभागवार जिल्हयांची नावे.*
_*🔰📶महा डिजी | जिल्हा इतिहास*_
💐 कोकण विभाग : मुंबई,मुंबई उपनगर,रायगड,ठाणे,रत्नागिरी,सिंंधुदुर्ग,पालघर.
💐 पुणे विभाग : पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर.
💐 नाशिक विभाग : नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव,नंदुरबार.
💐 अमरावती विभाग : अमरावती,बुलढाणा,अकोला,वाशीम,यवतमाळ.
💐 नागपूर विभाग : नागपूर,वर्धा,भंडारा,चंद्रपूर,गोंदिया,गडचिरोली.
💐 औरंगाबाद विभाग : औरंगाबाद,जालना,बीड,परभणी,लातूर,उस्मानाबाद नांदेड,हिंगोली.
महाराष्ट्र:
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जावू लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार" व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🧐तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं जाणून घ्या👇*
_*🔰📶महा डिजी | जिल्हा इतिहास*_
आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील. अशावेळी आपण बराच विचार करत असतो की, जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले. त्या मागचा इतिहास काय असेल. कशावरुन हे नाव ठेवण्यात आले असेल.असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्ह्यांची नाव काळानुसार बदलत गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्या त्या शहरांचा नावांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी ठरली असतील ते जरुर वाचा.
*💁♂️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे*
*सोलापूर*
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.
*सोलापूर जिल्हा विशेष माहिती*
https://www.uttar.co/answer/5a9568951e7f60273ffed8d2
*अमरावती*
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी ओळख असलेला अमरावती जिल्हा. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याचे मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे करण्यात आले.
*औरंगाबाद*
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे. आजच्या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी होते. तसेच अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.
*बीड*
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव पडले आहे.
*भंडारा*
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.
*बुलडाणा*
बुलडाणा जिल्हा हा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.
*चंद्रपूर*
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.
*धुळे*
महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.
*गोंदिया*
महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
*हिंगोली*
महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
*जळगाव*
महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.
*जालना*
महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.
*कोल्हापूर*
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.
*कोल्हापूर जिल्हा विशेष महत्त्व:*
https://www.uttar.co/answer/5dcc5244b05e3e8c5ff8e5cf
*लातूर*
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.
*मुंबई*
महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.
*नागपूर*
महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.
*नंदुरबार*
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.
*नाशिक*
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.
*उस्मानाबाद*
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.
*परभणी*
महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.
*पुणे*
महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.
*रायगड*
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.
*सांगली*
महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.
*सातारा*
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.
*ठाणे*
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.
*वर्धा*
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.
*वाशिम*
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.
*यवतमाळ*
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.
*अकोला*
महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.
*अहमदनगर जिल्हा विशेष महत्त्व*
https://www.uttar.co/answer/5cecbe77f7a7078161b6b22b
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
_*🔰📶महा डिजी | जिल्हा इतिहास*_
💐 कोकण विभाग : मुंबई,मुंबई उपनगर,रायगड,ठाणे,रत्नागिरी,सिंंधुदुर्ग,पालघर.
💐 पुणे विभाग : पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर.
💐 नाशिक विभाग : नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव,नंदुरबार.
💐 अमरावती विभाग : अमरावती,बुलढाणा,अकोला,वाशीम,यवतमाळ.
💐 नागपूर विभाग : नागपूर,वर्धा,भंडारा,चंद्रपूर,गोंदिया,गडचिरोली.
💐 औरंगाबाद विभाग : औरंगाबाद,जालना,बीड,परभणी,लातूर,उस्मानाबाद नांदेड,हिंगोली.
महाराष्ट्र:
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जावू लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार" व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🧐तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं जाणून घ्या👇*
_*🔰📶महा डिजी | जिल्हा इतिहास*_
आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील. अशावेळी आपण बराच विचार करत असतो की, जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले. त्या मागचा इतिहास काय असेल. कशावरुन हे नाव ठेवण्यात आले असेल.असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्ह्यांची नाव काळानुसार बदलत गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्या त्या शहरांचा नावांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी ठरली असतील ते जरुर वाचा.
*💁♂️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे*
*सोलापूर*
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.
*सोलापूर जिल्हा विशेष माहिती*
https://www.uttar.co/answer/5a9568951e7f60273ffed8d2
*अमरावती*
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी ओळख असलेला अमरावती जिल्हा. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याचे मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे करण्यात आले.
*औरंगाबाद*
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे. आजच्या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी होते. तसेच अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.
*बीड*
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव पडले आहे.
*भंडारा*
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.
*बुलडाणा*
बुलडाणा जिल्हा हा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.
*चंद्रपूर*
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.
*धुळे*
महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.
*गोंदिया*
महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
*हिंगोली*
महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
*जळगाव*
महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.
*जालना*
महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.
*कोल्हापूर*
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.
*कोल्हापूर जिल्हा विशेष महत्त्व:*
https://www.uttar.co/answer/5dcc5244b05e3e8c5ff8e5cf
*लातूर*
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.
*मुंबई*
महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.
*नागपूर*
महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.
*नंदुरबार*
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.
*नाशिक*
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.
*उस्मानाबाद*
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.
*परभणी*
महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.
*पुणे*
महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.
*रायगड*
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.
*सांगली*
महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.
*सातारा*
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.
*ठाणे*
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.
*वर्धा*
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.
*वाशिम*
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.
*यवतमाळ*
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.
*अकोला*
महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.
*अहमदनगर जिल्हा विशेष महत्त्व*
https://www.uttar.co/answer/5cecbe77f7a7078161b6b22b
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
0
Answer link
महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. प्रत्येक विभागात समाविष्ट जिल्हे आणि त्या जिल्ह्यांची नावे कशी पडली याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
1. कोकण विभाग:
- मुंबई शहर: नावाचा अर्थ 'समुद्राजवळचे शहर'. हे नाव 'मुंबा देवी' या स्थानिक देवीवरून पडले.
- मुंबई उपनगर: मुंबई शहराच्या जवळचा भाग म्हणून हे नाव देण्यात आले.
- ठाणे: 'श्री स्थानक' या शब्दावरून ठाणे हे नाव आले, ज्याचा अर्थ महत्वाचे ठिकाण.
- पालघर: 'पाल' म्हणजे संरक्षक आणि 'घर' म्हणजे निवासस्थान.
- रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला राजधानी बनविल्यामुळे या जिल्ह्याला रायगड हे नाव देण्यात आले.
- रत्नागिरी: 'रत्न' म्हणजे मौल्यवान आणि 'गिरी' म्हणजे डोंगर. रत्नागिरी हे नाव येथील डोंगरांमध्ये सापडणाऱ्या मौल्यवान खनिजांवरून पडले.
- सिंधुदुर्ग: 'सिंधू' म्हणजे समुद्र आणि 'दुर्ग' म्हणजे किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, त्यामुळे जिल्ह्याला हे नाव मिळाले.
2. पुणे विभाग:
- पुणे: 'पुण्यनगरी' या नावावरून पुणे हे नाव आले. याचा अर्थ 'पवित्र शहर' असा होतो.
- सातारा: सात (7) डोंगर/किल्ले असल्यामुळे या शहराला सातारा म्हणतात.
- सांगली: सांगली हे नाव 'सांगली' नावाच्या झाडीवरून आले.
- सोलापूर: सोळा (16) गावांमुळे या शहराला सोलापूर हे नाव पडले.
- कोल्हापूर: 'कोल्हासूर' नावाच्या राक्षसाचा वध या ठिकाणी झाला, त्यामुळे या शहराला कोल्हापूर हे नाव मिळाले.
3. नाशिक विभाग:
- नाशिक: नाशिक हे नाव 'नासिक' या शब्दावरून आले, ज्याचा अर्थ 'नाक' असा होतो.
- अहमदनगर: अहमदनगर शहराची स्थापना अहमदन शाहने केली, त्यामुळे जिल्ह्याला त्याचे नाव देण्यात आले.
- धुळे: 'धुळी' या शब्दावरून धुळे हे नाव आले.
- जळगाव: 'जळ' म्हणजे पाणी आणि 'गाव' म्हणजे गाव. जळगाव हे नाव या भागातील पाण्याच्या विपुलतेमुळे पडले.
- नंदुरबार: नंदूर नावाच्या गावालगतचा परिसर म्हणून ह्या जिल्ह्याला नंदुरबार नाव पडले.
4. औरंगाबाद विभाग:
- औरंगाबाद: औरंगजेब या मुगल शासकाने या शहराला त्याचे नाव दिले.
- जालना: 'जालना' हे नाव 'जालनापूर' या शब्दावरून आले.
- बीड: 'बीड' हे नाव 'बिळा'वरून आले, ज्याचा अर्थ भोके किंवा गुहा असा होतो.
- उस्मानाबाद: हैदराबादच्या निजामाच्या उस्मान अली खान नावावरून या जिल्ह्याला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले.
- लातूर: 'लातूर' हे नाव 'लाट' नावाच्या राजघराण्यावरून आले.
- परभणी: 'प्रभावती' या देवीच्या नावावरून परभणी हे नाव पडले.
- हिंगोली: हिंगोली हे नाव 'हिंगळ' नावाच्या झाडावरून आले.
- धाराशिव: धाराशिव हे नाव 'धारासुर' नावाच्या राक्षसावरून आले.
5. अमरावती विभाग:
- अमरावती: अमरावती हे नाव 'अंबावती' या नावावरून आले, ज्याचा अर्थ 'देवी Amba चे निवासस्थान'.
- बुलढाणा: 'बुल' म्हणजे उंच आणि 'ढाणा' म्हणजे जागा.
- अकोला: 'अकोला' हे नाव 'अकोली' नावाच्या झाडावरून आले.
- वाशिम: 'वाशिम' हे नाव 'वात्सगुल्म' या शब्दावरून आले.
- यवतमाळ: 'यवत' म्हणजे गाव आणि 'माळ' म्हणजे डोंगर.
6. नागपूर विभाग:
- नागपूर: नाग नदीच्या नावावरून नागपूर हे नाव पडले.
- वर्धा: वर्धा नदीच्या नावावरून जिल्ह्याला वर्धा हे नाव देण्यात आले.
- चंद्रपूर: 'चंद्र' म्हणजे चंद्र आणि 'पूर' म्हणजे शहर.
- भंडारा: 'भाना' म्हणजे भांडी आणि 'धारा' म्हणजे प्रवाह.
- गोंदिया: गोंड राजांच्या नावावरून गोंदिया हे नाव पडले.
- गडचिरोली: 'गड' म्हणजे किल्ला आणि 'चिरोली' हे एका स्थानिक वनस्पतीचे नाव आहे.
महत्व: जिल्ह्यांची नावे त्या भागातील ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शवतात. ही नावे त्या प्रदेशाची ओळख आणि परंपरा जतन करतात.